Headlines

Horrific truck accident on akola highway both drivers dead on the spot; हायवेवर दोन ट्रकचा भीषण अपघात; दोन्ही चालक जागीच ठार, बॉडी छिन्नविछिन्न, रस्त्यावर भयंकर दृश्य


प्रियांका जाधव, अकोला: अकोल्याजवळ महामार्गावर मध्यरात्री दोन ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वीर भगतसिंग बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरणखेड येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विभागाजवळ पैलपाडा पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. मुर्तीजापुरहून अकोल्याकडे जाणारा ट्रक (एन.एल.01 ए.के.1105) आणि समोरून येणारा ट्रक (एम.एच.28 बि.बी.3667) यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. एका चालकाचे नाव जगजीत सिंग (रा. यवतमाळ) असून, दुसरा चालक देविदास नारायणन (रा. जळका भडंग, खामगाव) असल्याचे समजते.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज उघडे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अथक परिश्रम घेऊन अपघातग्रस्त ट्रकांमधून मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर, मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान, या मदतकार्यात वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख विजय माल्टे, शाहबाज शाहा, उमेश माल्टे, अक्षय मोरे, तसेच पैलपाडा येथील आपत्कालीन पथकाचे रंजित घोघरे, विरू देशमुख, राम उमाळे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत