Nepal Floods: नेपाळमध्ये थैमान घातलेल्या विनाशकारी पूर सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. असंख्य भारतीय पर्यटक या पुरामुळे नेपाळमध्ये अडकले असून भारतातील अनेक जिल्ह्यांमध्येही पुराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुराचा धोका असलेल्या ठिकाणी राहणारे लोक पूरासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून आपली घरे आणि वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी विमा खरेदी करतात.
पण तुम्हाला माहित आहे का की, काही चुकांमुळे पुराच्या पाण्यामुळे नुकसान होऊनही विमा कंपन्या तुमचा गृह विमा नाकारू शकतात? होय, तुम्हीपण असाच विमा उतरवला असेल तर अशा परिस्थितींबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये घर किंवा वाहन विमा नाकारला जाऊ शकतो.
कोणत्याही प्रकारच्या नुकसानीतून सावरण्यासाठी विमा पॉलिसी एकमेव पर्याय नाही. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी विमा कंपनी खूप मदत करू शकते, पण विमा घेण्याआधी अटी व शर्ती नीट न वाचल्यास आणि आवश्यक नियमांची माहिती नसल्यास तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. मात्र, दावा मिळवण्यासाठी योग्य प्रक्रिया फॉलो केली पाहिजे.
नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला तात्काळ माहिती दिली पाहिजे. बरेच लोक या प्रक्रियेत विलंब करतात आणि या विलंबामुळे त्यांचा दावा नाकारला जातो.
नुकसानीचा पुरावा सादर न करणे
पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या घर, वाहन किंवा घरातील इतर वस्तूंचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना पुरावा म्हणून व्हिडिओ आणि छायाचित्रे यांसारखी सर्व कागदपत्रे ताबडतोब गोळा केली पाहिजे.
विमा कंपनीला न कळवता घर दुरुस्त करणे
पूरस्थितीनंतर बरेच लोक विमा कंपनीला न कळवता आपल्या घरांच्या दुरुस्तीचे काम करू लागतात. अशा परिस्थितीत, घरातील पाणी काढणे आणि घर स्वच्छ करणे यासारखी तात्पुरती दुरुस्ती करण्यात हरकत नाही पण, तुम्ही घराच्या भिंती स्वच्छ करण्यासारखी कायमस्वरूपी दुरुस्ती केली, तर विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते.
जास्त रकमेच्या दाव्याच्या लोभापायी अनेक लोक नुकसानीबद्दल खोटी माहिती देतात आणि विमा कंपनीला याबद्दल कळताच तुमचा अख्खा दावा नाकारू शकते.
सर्वेक्षकाच्या तपासणीपूर्वी वस्तू फेकून देणे
विमा कंपनीला नुकसानीबद्दल कळवल्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन आणि नंतर दावा मंजूर करण्यासाठी एक सर्वेक्षक पाठवला जातो. पण बरेच लोक सर्वेक्षण पूर्ण होण्यापूर्वीच पुरामुळे बाधित वस्तू फेकून देतात, ज्यामुळे विमा दावा नाकारला जाऊ शकतो.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा