Headlines

Devendra fadnavis on delhi visit and speculations about moving to the center; पंढरपूरहून अचानक दिल्ली गाठली, महाराष्ट्रात बदलाचे वारे? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला


नागपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यातच पंढरपूरहून नागपूरला परतण्याऐवजी फडणवीस सोलापूरहून थेट दिल्लीला रवाना झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मी आज नागपूरला आहे, संध्याकाळी मुंबईला जाणार आहे, मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे,” असे सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस केंद्रात जाणार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे दिली जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. त्यातच फडणवीस थेट दिल्लीला गेल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, त्यांच्या या मिश्किल प्रतिक्रियेमुळे सध्या तरी या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर ठाकरे बंधूंनी केलेल्या सेलिब्रेशनवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य करत मुख्यमंत्री म्हणाले की, “काही हरकत नाही, उद्धव ठाकरे यांना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं, त्याचा मला आनंद आहे. मी देखील आनंदी आहे, शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते कुठल्या व्यक्तीचे कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे आहे. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचे हित महत्वाचे असतं ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणे आवश्यक होते ते निर्णय मोदीजींनी केले. उद्या संसदेत विधेयक मांडले जाणार, ज्यामुळे पुढच्या काळात आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे ते सुरक्षित राहण्याकरता कठोर निर्णय असणारा कायदा असेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘भाजप विरुद्ध भारत’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याबाबत फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटते की अशा प्रकारचे डायलॉग हे गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक वेळा मारलेले आहेत. पण त्यांच्या डायलॉगचा कुणावरही परिणाम होत नाही. संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. रात्री एक वाजता टाकलेला मोदींचा व्हिडिओ हा इंस्ट्राग्रामचे जगातले रेकॉर्ड मोडतो या वरून लक्षात येतं भारत कोणाच्या पाठीशी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत