Headlines

Shahapur Heavy Rain Sudden surge of water at Chondhe 5 tourists swept away


शहापूरच्या चोंढे येथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. यावेळी धबधब्याच्या पाण्याला मोठा प्रवाह आला. पाण्याच्या या प्रवाहात पाच जण वाहून गेले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता आहे. तर तिघांना वाचवण्यात स्थनिक ग्रामस्थांना यश आलं आहे.

Shahapur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : सध्या पावसाचं वातावरण आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त अनेक पर्यटक पावसाळी सहल म्हणून वेगवेगळ्या धबधबा असलेल्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद घेत असतात. पण अशाप्रकारचा आनंद कधी जीवावर बेतेल याचा भरोसा नाही. पोलीस प्रशासनाकडून नेहमी पावसाळ्यात नदी किनाऱ्यावर आणि धबधबा असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो. आतादेखील तसेच निर्बंध घालण्यात आली आहेत. पण तरीही काही जण ऐकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी गेल्यावर अचानक पावसाचा प्रवाह वाढल्यानंतर जीवावर बेतू शकतं. अशीच एक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आज मुसळधार पाऊस पडत आहे. शहापूरच्या डोळखांब परिसरात तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे चोंढा-घाटघर प्रकल्प परिसरात मोठा पाऊस पडला.

मुसळधार पावसामुळे चोंढा धबधबा परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. डोंगरदऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा वेग हा अचानक वाढला. त्यामुळे तिथे धबधब्याखाली निसर्गाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना काय होत आहे ते कळण्याआधीच पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. परिसरातील पर्यटक सैरावैरा पळू लागले. पाण्याचा लोंढा इतका मोठा होता की त्या पाण्यातून चक्क पाच पर्यटक वाहून गेले. यामुळे परिसरातील पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली.

ग्रामस्थांकडून बचावकार्य

पर्यटक वाहून जात असताना अनेकांनी किंचाळ्या मारल्या. अनेक जण रडू लागले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी पुढे धावले. ग्रामस्थांनी तातडीने वाहून जाणाऱ्या पर्यटकांच्या बचावासाठी प्रयत्न केले. या दरम्यान तीन पर्यटकांना वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले. तर एकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तसेच एका पर्यटकाचा अद्यापही शोध सुरु आहे.

तिघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाच्या लोंढ्यात वाहून गेलेले सर्व पाचही पर्यटक हे कल्याणचे होते. स्थानिक ग्रामस्थांनी प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मुरकुटे या पर्यटकांचा जीव वाचवला. ते सुखरुप बचावले आहेत. यापैकी प्रसाद इंगळे हे कल्याणच्या आधारवडी येथील रहिवासी आहेत. तर नितेश पाटील हे कल्याणच्या गांधी चौक परिसरात वास्तव्यास आहेत. तर अजय मुरकुटे हे कल्याणच्या बारवेगावचे रहिवासी आहेत.

या घटनेत कल्याणच्या आधारवाडी परिसरात राहणारा 21 वर्षाचा तरुण आकाश महेंद्र देशमुख याचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण पूर्वेत राहणारे 34 वर्षीय दिशेन मांडलकर हे बेपत्ता आहेत. त्यांचा सध्या शोध सुरु आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा