Vaibhav Sooryavanshi News : झिम्बाब्वे दौऱ्यात मॅन ऑफ द मॅच अन् मॅन ऑफ द सिरीज पटकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या वादळी फलंदाजीची जोरदार चर्चा आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताच्या ३-० अशा दणदणीत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या भारताच्या १८ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार पटकावणे हे माझ्यासाठी ‘स्वप्न पूर्ण झाल्यासारखे’ आहे, असे वैभवने सामना संपल्यानंतर सांगितले.
अंतिम सामन्यात ४९ बॉलमध्ये ८१ धावा
रविवारच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये ८१ धावांची वादळी खेळी उभारली. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला आणि ३५ धावांनी सामना जिंकत मालिकेवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैभव म्हणाला, “हो, हा खरोखरच माझ्यासाठी एक स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझा पहिला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला, याचा मला खूप मोठा आनंद आहे.”
या संपूर्ण दौऱ्यात वैभवने टी-२० मध्ये आपली पहिली दोन अर्धशतके झळकावली. आपल्या यशाबद्दल बोलताना तो म्हणाला, “हरारेमध्ये आल्यानंतर आमची २-३ दिवसांची तयारी खूप छान झाली होती. मी आधी या मैदानावर अंडर-१९ वर्ल्ड कप खेळलो असल्यामुळे मला इथे खेळायला खूप आवडते. कॅप्टन, कोच आणि टीममधील सर्वांनीच मला पूर्ण पाठिंबा दिला, त्यामुळे मी खूप खूश आहे.”
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या डाव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या रणनीतीबद्दल सांगितले, “टी-२० क्रिकेटमध्ये मी जसा खेळतो, तसाच खेळ इथेही खेळण्याचा माझा प्रयत्न होता. तिन्ही सामन्यांत भारताला चांगली सुरुवात करून देणे हे माझे मुख्य ध्येय होते. एकदा चांगली सुरुवात मिळाली की, त्या खेळीला मोठे करायचे हाच माझा विचार होता. सरावाच्या वेळी मी जे फटके मारण्याचा सराव करतो, तेच फटके मी प्रत्यक्षात सामन्यात मारण्याचा प्रयत्न केला.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा