Headlines

वैभव तू एवढा कसा फोडतो रे? झिम्बाब्वेत पराक्रम, मालिकावीर पुरस्कार खिशात! सूर्यवंशीने आक्रमक खेळीमागचं कारण सांगून टाकलं


Vaibhav Sooryavanshi News : झिम्बाब्वे दौऱ्यात मॅन ऑफ द मॅच अन् मॅन ऑफ द सिरीज पटकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या वादळी फलंदाजीची जोरदार चर्चा आहे.

vaibhav sooryavanshi man of the series zimbabwe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताच्या ३-० अशा दणदणीत विजयाचा शिल्पकार ठरलेल्या भारताच्या १८ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार पटकावणे हे माझ्यासाठी ‘स्वप्न पूर्ण झाल्यासारखे’ आहे, असे वैभवने सामना संपल्यानंतर सांगितले.

अंतिम सामन्यात ४९ बॉलमध्ये ८१ धावा

रविवारच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये ८१ धावांची वादळी खेळी उभारली. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला आणि ३५ धावांनी सामना जिंकत मालिकेवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैभव म्हणाला, “हो, हा खरोखरच माझ्यासाठी एक स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझा पहिला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला, याचा मला खूप मोठा आनंद आहे.”

Maharashtra TimesAbhishek Sharma : झिम्बाब्वेत अभिषेक फ्लॉप! अख्ख्या सीरिजमध्ये फक्त 11 रन, एकाच बॉलरकडून तीनदा आऊट, कुठे चुकला शर्मा?

हरारेच्या मैदानावर खेळायला आवडतं

या संपूर्ण दौऱ्यात वैभवने टी-२० मध्ये आपली पहिली दोन अर्धशतके झळकावली. आपल्या यशाबद्दल बोलताना तो म्हणाला, “हरारेमध्ये आल्यानंतर आमची २-३ दिवसांची तयारी खूप छान झाली होती. मी आधी या मैदानावर अंडर-१९ वर्ल्ड कप खेळलो असल्यामुळे मला इथे खेळायला खूप आवडते. कॅप्टन, कोच आणि टीममधील सर्वांनीच मला पूर्ण पाठिंबा दिला, त्यामुळे मी खूप खूश आहे.”

Maharashtra TimesAnahat Singh Wins Gold : 18 वर्षांच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! 15 वर्षांचा इजिप्तचा दबदबा मोडत जिंकले गोल्ड; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

मैदानावर रणनीती काय होती ?

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या डाव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या रणनीतीबद्दल सांगितले, “टी-२० क्रिकेटमध्ये मी जसा खेळतो, तसाच खेळ इथेही खेळण्याचा माझा प्रयत्न होता. तिन्ही सामन्यांत भारताला चांगली सुरुवात करून देणे हे माझे मुख्य ध्येय होते. एकदा चांगली सुरुवात मिळाली की, त्या खेळीला मोठे करायचे हाच माझा विचार होता. सरावाच्या वेळी मी जे फटके मारण्याचा सराव करतो, तेच फटके मी प्रत्यक्षात सामन्यात मारण्याचा प्रयत्न केला.”