Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून, त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच मागण्यांबाबत सरकारने लिखित आश्वासनही दिले आहे. त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या दिशेने असताना आंदोलन सुरू ठेवण्याचा आग्रह कशासाठी, असा सवाल बावनकुळे यांनी केला.
Tribal student protest | आदिवासी विद्यार्थी संतप्त, अशोक उईकेंना राजीनाम्याची राखी दाखवत थेट मागणी
राज्य सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास तयार असून, गरज भासल्यास पुन्हा-पुन्हा चर्चा करण्याची सरकारची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यास सरकार कटिबद्ध आहे. मात्र, प्रश्न सुटण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असतानाही आंदोलन सुरू ठेवले जात असल्याने त्यामागे राजकीय हेतू असल्याचे दिसून येते, असे बावनकुळे म्हणाले.
‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका’
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय आंदोलन करण्याचा हा प्रकार त्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न हे राजकारणासाठी वापरण्याचे साधन होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि संधी वाढविण्यासाठी संवेदनशीलतेने काम करीत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचविण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.
Nagpur Crime : बारमध्ये मित्रांसोबत दारु प्यायला बसलेला, पत्नीचा फोन येताच बाहेर आला अन् तिथेच घात झाला; कुख्यात गुंडाला प्लॅन करुन संपवलंसरकारशी संवाद साधण्याचे आवाहन
आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत काँग्रेसला खरोखरच आस्था असेल, तर विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. ‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. राहुल गांधी यांच्या राजकीय पुनरागमनासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करणे महाराष्ट्र कदापि स्वीकारणार नाही,’ असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

