पाऊस, भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रेला ब्रेक
वृत्तसंस्था श्रीनगर जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. मुसळधार पावसानंतर यात्रामार्गात झालेल्या भूस्खलनामुळे शनिवारी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून यात्रेकरूंची कोणतीही नवीन तुकडी काश्मीर खोऱ्यात पाठवता आली नाही. सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग-44 चा काही भाग सध्या…
