Maharashtra Politics: ‘नॉट रिचेबल’ नगरसेवकांवरुन राजकारण तापले; भाजप नेत्यांचा संपर्कात नसल्याचा दावा, काँग्रेसची टीका सुरुच
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे ७० नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असल्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नगरसेवकांना पाच लाख रुपये देऊन भाजपने उचलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप नेत्यांनी हा दावा खोडून काढला आहे. या आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले आहे. भाजपचे आमदार बंटी भांगडिया म्हणाले, की विकासकामांसाठी काँग्रेसचे अनेक नगरसेवक…
