यावेळी त्यांनी वंदे मातरम्, जेन-झी आंदोलन, धर्मस्वातंत्र्य कायदा, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, तसेच पुणे आणि गडचिरोलीतील घटनांवरही आपली भूमिका मांडली. अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी दिव्या देशमुखच्या कामगिरीचे कौतुक केले. अशा खेळाडूंच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
Amruta Fadnavis: जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेतकाँग्रेसवर टीका
वंदे मातरम् गायनावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना अमृता फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. ‘काँग्रेस स्वतःचे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा आरोप त्यांनी केला.
युवकांचा सहभाग महत्त्वाचा
‘मंथन फॉर युवा’ उपक्रमाचे कौतुक करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, हॅकथॉन, आयडियाथॉन, प्रदर्शन आणि स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना समाजासमोर मांडल्या आहेत. यातील अनेक प्रकल्प लोकउपयोगी ठरू शकतात. ‘मेक इन इंडिया’ यशस्वी करण्यासाठी जेन-झीचा सहभाग महत्त्वाचा आहे. युवकांना शिक्षण, रोजगार आणि स्टार्टअपसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
Nitin Gadkari: लोक दोन्ही बाजूंनी तबला वाजवतात; मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्सवर गडकरींची टिप्पणी, टीकेवर काय म्हणाले?राज्याचे अढळस्थान
गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाच्या जोडणीसाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रांतील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे यशस्वी ठिकाण असून, राज्याचे स्थान अढळ आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या हॉटेल ललित येथे आयोजित राष्ट्रीय परिषद २०२६ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर, उत्तर प्रदेशाचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अरोरा, अवनीश अवस्थी आदी मंचावर उपस्थित होते.

