Satara government employee died in car accident in Karad cctv footage reveals mystery; कराडमध्ये कार अपघातात मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती
Satara government employee died in car accident in Karad cctv footage reveals mystery; कराडमध्ये कार अपघातात मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती
सुधीर पाटील, सातारा : पत्नीनेच सुपारी देऊन स्वतःच्या पतीला गाडीखाली चिरडून त्यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले, असं हत्या झालेल्याचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते. कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्हा उघडकीस आणत मृताच्या पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ही हत्या पतीशी असलेल्या वादातून की अन्य कारणातून झाली आहे, हे अधिक तपासात समोर येईल.
कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले सलग दोन दिवस सुट्टी असल्याने शुक्रवारी रात्री ठाण्याहून कराडला येत होते. शनिवारी (६ जून) सकाळी साडे पाचच्या दरम्यान कोल्हापूर नाक्यावर उतरून चालत येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अल्टो कारने यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर त्यांना उडविले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी मंडले गंभीर जखमी अवस्थेत पडले होते.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने ते आपले पती लक्ष्मण श्रीरंग मंडले असून ठाण्याहून कराडला आले होते. त्यांना घेण्यासाठी मी आले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीसांनी जखमी अधिकाऱ्याला रूग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणाचा संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता धक्कादायक प्रकार समोर आला.
लक्ष्मण मंडले हे चालत निघाले असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. त्यांची बॅग आणि अन्य साहित्य घेऊन दोघेजण पळून गेले. काही वेळात परत येऊन पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले.
पोलीस अंमलदार नवनाथ व्हनमाने यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गतीने तपास सुरू केला. मृत लक्ष्मण श्रीरंग मंडले (जलसंधारण अभियंता, शहापूर, जि. ठाणे, मूळ रा. मनव, ता. कराड) यांनी आपण बसने कराडला येत आहोत. मला पहाटे कोल्हापूर नाक्यावर घ्यायला ये, असे पत्नी सुरेखाला फोन करुन सांगितले होते. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते, अशी माहिती तपासात समोर आली. त्यानंतर या भयंकर हत्येचा उलगडा झाला.
पती त्रास देत असल्याच्या रागातून एक महिन्यापूर्वी सुरेखा मंडले व तिचा सख्खा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांनी मुंबई येथे जाऊन त्याचा काटा काढायचा प्लान केला होता. त्यासाठी ओळखीच्या दोघांना सुपारी दिली. त्यांना पतीचे लोकेशन कळवून पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तपासात निष्पन्न झाली. याप्रकरणी मृताची पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय 36, रा. मनव, ता. कराड), मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय 40, रा. सुरुल, ता. वाळवा, जि. सांगली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करून पळून गेलेल्या दोघांच्या शोधार्थ तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा