Headlines

BJP Political Strategy Shift; Neerja Chaudhary Column On 2027 Elections


29 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎तरुणांच्या आंदोलनांनी देशातील शिक्षण व्यवस्थेची‎स्थिती बदलण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला आहे.‎20 जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या‎लाठीहल्लाप्रकरणी राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका‎घेतली आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न‎करत आहे. त्यामुळे 2027 च्या सुरुवातीला होणाऱ्या‎विधानसभा निवडणुकांच्या तयारीकडे सर्वांचे लक्ष लागले‎आहे. भाजपवरही आपले राजकीय वर्चस्व पुन्हा‎प्रस्थापित करण्याचा दबाव वाढला आहे.‎

आगामी निवडणुकांच्या तयारीचे पहिले पाऊल म्हणून‎भाजपने नुकतेच आपल्या संघटनेत फेरबदल केले आहेत.‎भाजप अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आठ महिन्यांनी‎नितीन नवीन यांनी अखेर आपली नवीन टीम जाहीर‎केली. यात काही धक्कादायक नावे समोर आली. स्मृती‎इराणी आणि राम माधव यांचे पुनरागमन झाले. पण हे‎बदल फारसे नाट्यमय नव्हते. नव्या आव्हानांनुसार‎पक्षाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे.‎भाजपच्या अंतर्गत रचनेत व संघ परिवारासोबतच्या‎संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो.

अनुभव व‎बदल यांना एकत्र आणत पक्षातील विविध गटांना‎जोडण्याचे प्रयत्नही यात स्पष्ट दिसतात. 1990 च्या‎दशकात लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपमध्ये तरुण‎नेतृत्वाला घडवण्याचे काम सुरू केले होते. त्यांनी सुषमा‎स्वराज, प्रमोद महाजन, गोविंदाचार्य, व्यंकय्या नायडू व‎उमा भारती यांसारख्या तरुण नेत्यांना पुढे आणले.‎अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेत हीच‎मंडळी त्यांची मुख्य टीम होती. गुजरातवरून ही यात्रा सुरू‎करण्यात नरेंद्र मोदी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली‎होती. पुढे अरुण जेटली समोर आले. कर्नाटकातून अनंत‎कुमार यांचा उदय झाला. मागे वळून पाहिल्यास‎भाजपमध्ये नवे नेतृत्व तयार करणे हे अडवाणी यांचे सर्वात ‎‎मोठे योगदान मानले जात होते. संघटनेतील बदलानंतर‎आता लोक संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाची वाट पाहत ‎‎आहेत. 12 वर्षांच्या सत्तेनंतर कथित असंतोषाचा सामना ‎‎करण्यासाठी पक्ष काय करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.‎पक्ष यासाठी एखादा मोठा निर्णय घेणार, की संथ गतीने‎बदल करण्याचा मार्ग निवडणार?‎

वास्तविक, चार महत्त्वाच्या कारणांमुळे पक्ष संघटनेत ‎‎फेरबदल करणे अनिवार्य झाले होते. पहिले कारण म्हणजे ‎‎‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’ चे आव्हान. जंतर-मंतर‎व झारखंडसह देशाच्या विविध भागात शाळकरी मुलांनी ‎‎केलेल्या आंदोलनांवरून हे आव्हान स्पष्ट झाले आहे.‎तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा शांत ‎‎करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पारंपरिक राजकीय ‎‎पक्षांपेक्षा वेगळे असलेले हे तरुण सरकारच्या कोणत्याही ‎‎अटींवर तडजोड करण्यास तयार नाहीत. भूतकाळात‎विरोधी पक्ष मुद्दे उपस्थित करत असत, आपली बाजू‎मांडत असत आणि राजकीय फायदा घेत असत. नंतर‎काही मागण्या मान्य झाल्यावर सरकारसोबत तडजोड‎करत असत. पण ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’‎आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. भाजप त्यांच्याशी‎संवाद वाढवू इच्छितो. याचा मार्ग सोशल मीडिया त्यातही ‎‎‘इन्स्टाग्राम’द्वारे जातो असे दिसते; त्याकडे पक्षाने‎आतापर्यंत दुर्लक्ष केले होते. पक्ष ‘एक्स”” (ट्विटर)‎आणि ‘फेसबुक””वर अधिक लक्ष केंद्रित करत होता.‎भाजपने आपल्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय‎यांना हटवणे म्हणजे त्यांनी स्वीकारलेली आक्रमक शैली‎आता प्रभावी राहिलेली नाही, याची कबुलीच होती.‎भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका वर्गाला‎असेही वाटते की, 20 जुलै रोजी आंदोलनकर्त्यांवर‎केलेल्या बलप्रयोगाचा विपरीत परिणाम झाला आहे.‎

दुसरे स्पष्ट कारण म्हणजे 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब,‎गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोवा‎येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुका. नव्या चेहऱ्यांच्या‎आगमनाने या राज्यांमध्ये पक्षाच्या कामात नवी ऊर्जा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎येईल, अशी अपेक्षा आहे. आम आदमी पक्ष सोडून‎भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सात राज्यसभा खासदारांपैकी‎एक असलेल्या संदीप पाठक यांना राष्ट्रीय सचिव‎करण्यात आले आहे. सहसा हे पद पक्षात नव्याने आलेल्या‎लोकांना दिले जात नाही. यावरून भाजप नेतृत्व पंजाबला‎किती महत्त्व देत आहे हे दिसून येते. 2022 मध्ये आम‎आदमी पक्षाच्या पंजाबमधील निवडणुकीतील विजयात‎संदीप पाठक यांनी डेटा डिझायनिंग, बूथ मॅनेजमेंट आणि‎डिजिटल मीडिया आधारित रणनीती आखण्यात‎महत्त्वाची भूमिका बजावली होती.‎

भाजप आता या सीमावर्ती राज्यात आपली स्थिती भक्कम‎करण्यासाठी आणि सत्ता स्थापनेच्या शर्यतीत स्वतःला‎मजबूत खेळाडू म्हणून मांडण्यासाठी पाठक यांच्या‎अनुभवाचा वापर करू इच्छितो. ‘महिला”” हा घटक‎2027 च्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या‎लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुख्य मंत्र असणार‎आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याचे संकेत‎दिले होते. महिला आरक्षण विधेयकासोबतच परिसीमन‎(प्रभाग रचना) विधेयक मंजूर करता यावे, यासाठी‎भाजप संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न‎करत आहे. स्मृती इराणी यांना सरचिटणीस तर वसुंधरा‎राजे यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. पक्षाच्या 15‎उपाध्यक्षांपैकी आता 6 महिला आहेत. 65 सदस्यांच्या या‎टीममध्ये एकूण 12 महिला आहेत, म्हणजेच हे प्रमाण 18‎टक्क्यांहून अधिक आहे. तिसरा घटक म्हणजे‎आरएसएस. संघाने नेहमीच भाजपच्या संघटित रचनेला‎प्राधान्य दिले आहे. पक्ष संघटना बांधणीत आपली भूमिका‎असावी, अशी संघाची इच्छा असते. बी. एल. संतोष‎राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून कायम राहणे हे‎दर्शवते की पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये संघाचे महत्त्व‎कायम आहे.‎

फेरबदलामागील चौथे कारण म्हणजे भाजप नेतृत्व‎पक्षातील अंतर्गत शक्ती-गट आणि संघ परिवार यांच्यात‎समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी बाजूला‎पडलेल्या राम माधव व स्मृती इराणी यांचे पुनरागमन झाले.‎भाजपची ही नवीन टीम केवळ अमित शाह यांच्या‎पसंतीची नाही, असा संदेश यातून दिला जात आहे;‎त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या‎मिळाल्या तरीही. नव्या टीममध्ये सुनील बन्सल यांचाही‎समावेश आहे. त्यांनी पूर्वी उत्तर प्रदेश व अलीकडे‎बंगालमधील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.‎विनोद तावडे हे देखील महत्त्वाच्या सरचिटणीसांमध्ये‎सामील आहेत. (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.)‎

QuoteImage

12 वर्षांच्या सत्ताकाळानंतर‎आता पक्षाची भूमिका काय ?‎‎संघटनेतील बदलानंतर आता लोकांचे लक्ष‎मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. 12‎वर्षांच्या सत्ताकाळानंतर भाजप वाढत्या‎असंतोषाला कसा तोंड देतो, हे पाहणे‎महत्त्वाचे ठरेल. पक्ष यासाठी काही कठोर‎पावले उचलणार की संथ आणि‎टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा मार्ग‎निवडणार, याबद्दल उत्सुकता आहे.‎‎‎

QuoteImage



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत