Headlines

Sangli Satara Vidhan Parishad Shiv Sena helps BJP despite Gokul Gite defeat in Nashik; नाशिकमध्ये भाजपकडून कुस्ती, साताऱ्यात मात्र शिवसेनेची दोस्ती, ZP तील गोंधळानंतरही युती निभावली


Sangli Satara Vidhan Parishad : सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी झालेल्या प्रकारामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार दगाफटका करण्याची भीती होती. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा भाजपने करेक्ट कार्यक्रम केला, तर सांगली-सातारा मतदार संघातील अडचणीत असलेल्या आपल्या उमेदवाराला मात्र भाजपने त्याच शिवसेनेच्या मतांवर निवडून आणले.

Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashtra Times (6)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : विधान परिषद निवडणुकीत भाजपची दुहेरी चाल समोर आली आहे. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा भाजपने करेक्ट कार्यक्रम केला, तर सांगली-सातारा मतदार संघातील अडचणीत असलेल्या आपल्या उमेदवाराला भाजपने निवडून आणले. भाजपने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर केलेल्या या कुरघोडीचे भविष्यात काय पडसाद उमटतात, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

नाशकात भाजप-राष्ट्रवादीची मतं फुटली

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील भाजपकडे १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादीकडे १०७, असे ४६६ संख्याबळ असतानाही शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मते पडली. या उलट भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना तब्बल ३५७ मते मिळाली. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यातही भाजपची सर्वाधिक मते फुटल्याचे बोलले जात आहे. त्यातही आम्ही गोकुळ गितेंना मदत करून निवडून आणल्याचा दावा शिवसेना उबाठाने केला आहे. नाशिकमधील या निकालानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे.
Maharashtra TimesMaharashtra Politics : चौथा ‘संजय’ही धक्का देणार? ठाकरेंच्या तातडीच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चा; आता चौघांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण

भाजपला दगाफटक्याची भीती

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांच्या समोर आव्हान होते. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राड्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार दगाफटका करण्याची भीती होती. शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी शेवटपर्यंत ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

जळगावात युतीधर्म, पण नाशिकमध्ये बंडखोरी; शिवसेना नेत्याची भाजपविरोधात खदखद

भाजप नेत्यांना धोक्याची चाहूल लागताच भाजपकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न झाला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांची एकत्रित बैठक झाल्यानंतर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम पहिल्या पसंतीची मते मिळवून विजयी होऊ शकले. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले. त्याठिकाणी भाजपचे बंडखोर गोकुळ गिते विजयी झाले. शिवसेना उबाठा गटाची गितेंना मदत झालीच, पण भाजपच्या मतदारांनीही गितेंनाच साथ दिल्याचे उघड झाले आहे.
Maharashtra TimesOmraje Nimbalkar : माझी खरी निष्ठा कोणत्याही पद-पक्षाशी नाही, शिवसेना प्रवेशानंतर रात्री 10.49 वाजता ओमराजेंची मोठी घोषणा

गोरेंचा देसाईंना अप्रत्यक्ष टोला

विधान परिषद निवडणुकीत महायुतीची मते फुटल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांनी खोचक प्रतिक्रिया देत नाव न घेता शिवसेना नेते, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला. धैर्यशील कदम यांना किती मते पडायला पाहिजे होती, कोणी मते दिली नाहीत, काय घडले, याचा आम्ही नक्कीच हिशोब करू. हिशोब करण्यात आम्ही पक्के आहोत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी काय केले ते देवाला माहिती, असा टोला जयकुमार गोरे यांनी नाव न घेता लगावला. अनेकांची गणिते वेगवेगळी होती. अनेकांच्या मनात एक, ओठात एक आणि करणीत वेगळे होते, अशा शब्दांत गोरे यांनी मत फुटीचा अप्रत्यक्षपणे ठपका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर ठेवला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा