Headlines

फुल्ल फॉर्ममधल्या वैभवला ड्रिंक्ससाठी ठेवलंत? मॅनेजमेंटचं गणितच चुकलं! आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यातल्या चुकांवर माजी क्रिकेटरचा संताप


मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने भारताच्या टीम मॅनेजमेंट आणि नियोजनकर्त्यांवर निशाणा साधला आहे.त्याने इंग्लंडसारख्या बलाढ्या संघाविरुद्ध खेळण्यासाठी पराक्रमी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे पदार्पण करणे गरजेचे होते, असे म्हटले आहे. कारण असे झाले असते तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुलभ आणि तणावफ्री झाला असता. वैभवनं आयपीएलमध्ये त्या आक्रमक फलंदाजीने खळबळ उडवून दिलेली आहे. लहान वयामध्येच त्याने प्रचंड दबावात तडाखेबाज फलंदाजी केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. वैभवने केवळ काही सामन्यांमध्येच चांगली खेळी केली आहे, असे नाही तर संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. त्यामुळेच त्याला ऑरेंज कॅप जिंकता आली.

त्याच्या आयपीएलमधील शानदार खेळीनंतर टीम इंडियामध्ये त्याची निवड झाली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टी२० दौऱ्यासाठी त्याला पहिल्यांदाच संधी मिळाली. त्याचा अलिकडचा फॉर्म पाहता आयर्लंडविरुद्ध नक्कीच त्याला संधी मिळेल, अशी शक्यता होती. पण प्लेईंग ११ मध्ये त्याला संधी मिळालीच नाही. पूर्ण मालिकेत एकही सामना त्याला खेळवले नाही आणि आयर्लंडविरुद्ध खराब फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनच्या जागी त्याला इंग्लंडसारख्या बलाढ्य संघासमोर खेळायला उतरवलं.

Maharashtra TimesRohit Sharma News : मला ड्रॉप करायचंय तर करा! लॉर्ड्सवरील शतकापूर्वी रोहित आणि निवडकर्त्यांमध्ये काय चर्चा? माजी क्रिकेटरने आतल्या गोष्टी फोडल्या

इंग्लंडच्या जागतिक दर्जाच्या बॉलर्सपुढे खेळताना वैभवची सुरुवात खडतर राहिली. जोफ्रा आर्चरसारख्या वेगवान गोलंदाजाचा सामना करताना वैभवसा फक्त १४, १३, १५ अशा माफक धावांवर समाधान मानावं लागलं. पहिल्या तीन सामन्यांमध्ये धावा न केल्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला पाचव्य़ा आणि अंतिम टी २० सामन्यातून वगळलं आणि संजूला पुन्हा संघात स्थान देण्यात आले.

दरम्यान, भारतासाठी १३ कसोटी आणि १२५ एकदिवसीय सामने खेळलेल्या मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब चॅनलवरून संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. कैफ म्हणाला की,”वैभव एक एक्स-फॅक्टर खेळाडू आहे. त्याने आपल्या कामगिरीने आपली छाप सोडली आहे. इतक्या लहान वयात आणि इतक्या दबावात त्याने आयपीएलमध्ये धावा केल्या. तो केवळ एक-दोन सामन्यांपुरता खेळणारा खेळाडू नव्हता; त्याने ऑरेंज कॅप जिंकली. त्याला आयर्लंडमध्येच खेळायला मिळायला हवे होते. जर तसे झाले असते, तर त्याची सुरुवातीची भीती आणि अस्वस्थता तिथेच संपली असती. मग, जेव्हा तो इंग्लंडमध्ये आला असता, तेव्हा त्याचा आत्मविश्वास एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला असता आणि त्याने तिथेही चांगली कामगिरी केली असती.”

Maharashtra TimesIshan Kishan News : क्रिकेटर इशान किशन RBI बँकेत मोठ्या पदावर कार्यरत; सरकारी नोकरीची स्टोरी अन् पगाराचा आकडा माहितीये का?

पुढे बोलताना कैफ म्हणाला की, “सामन्यात येण्यापूर्वी तो उत्तम फॉर्मात होता. पण तुम्ही त्याला आधी ड्रिंक्स द्यायला सांगितले. तो एक विशेष खेळाडू आहे. त्याला आयर्लंडमध्ये थेट संधी द्यायला हवी होती. जर कोणाकडे विशेष प्रतिभा असेल, तर त्याला तशी विशेष वागणूक मिळायला हवी. आयर्लंडमध्ये खेळल्याने त्याचा संकोच दूर झाला असता आणि त्याला यूकेमध्ये भीती वाटली नसती. “

दरम्यान, त्यानंतर झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत वैभवने शानदार पुनरागमन केले. वैभवने पहिल्या टी-२० मध्ये एक शानदार अर्धशतक झळकावले. दुसऱ्या टी-२० मध्ये त्याने २० धावांची खेळी केली. तिसऱ्या टी-२० मध्ये सूर्यवंशीने ८१ धावा केल्या. झिम्बाब्वे दौऱ्यात ३ सामन्यांमध्ये ५०.३३ च्या उत्कृष्ट सरासरीने वैभवने एकूण १५१ धावा केल्या आणि त्याला मालिकावीरपुरस्कारही मिळाला. यावरुन कैफ म्हणाला की, या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला चांगल्या व्यवस्थापनाची गरज आहे. तो अजून भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही, पण मला खात्री आहे की जेव्हा तो येथे खेळेल तेव्हा तो खूप धावा करेल.”