नव्या कामगार कायद्यांविरोधात अमरावतीत जेलभरो आंदोलन:350 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, नंतर सुटका
अमरावती येथे केंद्र सरकारच्या नव्या चार कामगार कायद्यांविरोधात कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शेतमजुरांनी ‘जेलभरो’ आंदोलन केले. या कायद्यांमुळे शासकीय व कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येऊन केवळ खासगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी ३५० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते, मात्र प्रतिबंधात्मक कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात आयटक, सीटू, स्वाभिमानी…
