Wardha Crime: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे माथेफिरु तरुणाने दोन वृद्धांना निर्घृणपणे संपवलं. या हल्ल्यात एक चिमुकली थोडक्यात बचावली. नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?
मत्या हा आर्वीतील नेताजी वॉर्ड परिसरात कुटुंबीयांसोबत राहतो. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी घरी कोणी नसताना त्याने स्वत:च्या आजीवर हल्ला केला. परंतु, शेजारी वेळीच धावून आल्याने आजीचा जीव वाचला. त्यानंतर हातात लाकडी दंडुका घेऊन तो दुपारी नग्नावस्थेत घराबाहेर पडला. रस्त्यावर दिसेल त्याला दांड्याने मारण्यासाठी तो नागरिकांच्या मागे धावायला लागला.
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी’चे पैसे काढणासाठी पतीचा अजब जुगाड; बँकेत पत्नीच्या जागी दुसरीलाच केले उभं अन्…
नेताजी वॉर्डमध्ये खेळत असलेल्या एका आठ वर्षांच्या मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न मत्याने केला. मात्र, तिने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावले आणि तिची सुटका केली. त्याचा त्रास वाढत असल्याचे पाहून काही जणांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना हुलकावणी देऊन तो दुसरीकडे पळून गेला. त्याने इंदिरा चौक येथे रस्त्यालगत बसलेल्या रामकृष्ण श्रावण राऊत (रा. हनुमाननगर, आर्वी) यांना दांड्याने मारहाण केली. त्यात राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. राऊत यांना मारल्यानंतर मत्याने इंदिरा चौक येथे शेतमाल विक्रीसाठी आलेल्या ८५ वर्षीय रामराव महादेव वांगे यांच्यावरही हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. वांगे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
Buldhana News: मेंदूचा आजार, अचानक बेशुद्ध पडली, रात्रभर रुग्णालयात पण… सेजलच्या मृत्यूने आईचा टाहो, बुलढाणा हळहळलं
मत्याचा त्रास वाढल्यानंतर काही नागरिकांनी हिंमत करून त्याला पकडले आणि चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी मत्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

