Bhupati’s Surrender Reason Revealed: गडचिरोलीत माओवादी नेता भूपती आणि त्याचे 60 साथीदार मुख्य प्रवाहात परतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे आत्मसमर्पण झाले. पोलिसांच्या कारवाईसोबतच पत्नी तारक्काच्या आर्त हाकेचाही यावर परिणाम झाला.
बच्चू कडूंची कृषीमंत्री भरणेंवर टीका, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजवरुन फडणवीसांनाही सुनावलं!
गडचिरोली: माओवादाच्या इतिहासातीस सर्वात मोठे समर्पण 15 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे झाले. कुख्यात माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने आपल्या 60 साथीदारांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. पण प्रश्न असा एवढ्या वर्षांच्या लढाईनंतर आणि बाकी माओवाद्यांच्या विरोध आणि बहिष्कार पत्करूनही या नेत्याला अचानक शांततेचा मार्ग का योग्य वाटला?
भूपती आणि त्याच्या साथीदारांने लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, पोलिसांच्या सततच्या कारवाईनंतर त्यांच्याकडे शस्त्र टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.परंतू असे मानले जात आहे की, त्याच्या आत्मसमर्पणामागचं खरं कारण केवळ पोलिसांचा दबाव नसून तर त्याची पत्नी तारक्का हिचं आर्त आवाहन आणि दीर्घकाळाचं प्रेम हे होतं.
भूपती आणि तारक्काच्या प्रेमकथेची सुरुवात 1986 मध्ये झाली. गडचिरोली जिल्ह्यातील किष्टापूर येथील एका सामान्य कुटुंबातील तरुणी विमला उर्फ तारक्का माओवादी संघटनेत सामील झाली आणि त्याच दरम्यान तिची भेट मूळ तेलंगणातील आणि गडचिरोलीत सक्रिय असलेल्या भूपतीशी झाली. संघटनेत एकत्र काम करत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबंधनात अडकले. लग्नावेळी विमलाचं वय अवघं 17 वर्षे होतं. लग्नानंतर ती “तारक्का दीदी” म्हणून ओळखली जाऊ लागली आणि दंडकारण्यात झोनल समिती सदस्य पदावर कार्यरत राहिली.
तारक्काने दाखवला मुख्य प्रवाहाचा मार्ग
माओवादी संघटलनेत सक्रिय असताना तारक्कावर तब्बल 66 गुन्हे दाखल होते आणि पोलिसांनी तिच्यावर 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र प्रकृतीच्या कारणांमुळे तिनं 1 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं आणि मुख्य प्रवाहात परतली. रक्कानं शस्त्र खाली ठेवल्यानंतर ती वेळोवेळी आपल्या पतीला भूपती ऊर्फ सोनूला मुख्य प्रवाहात परत येण्याचं आणि शरण जाण्याची विनंती करत होती.
तारक्काचं 40 वर्षांचं प्रेम आणि तिची आर्त विनंती विसरणे भूपतीला शक्य झाले नाही. पोलिसांच्या कारवाईसोबतच पत्नीच्या भावनिक आवाहनाचाही परिणाम म्हणून अखेर भूपतीनं 15 ऑक्टोबरला 60 नक्षली साथीदारांसह आत्मसमर्पण केलं.
बच्चू कडूंची कृषीमंत्री भरणेंवर टीका, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजवरुन फडणवीसांनाही सुनावलं!
पत्नीला पाहताच भूपतीचा चेहरा फुलला
समर्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तारक्काला देखील मंचावर बोलावण्यात आलं. भूपतीनं तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या दोघांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या आत्मसमर्पणानंतर भूपती आणि तारक्का या दोघांनाही समाजात सन्मानाने नव्याने जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. नक्षलवाद्यांना शांततेच्या मार्गावर आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि सी-60 दलाने राबवलेल्या प्रभावी धोरणाचं हे मोठे यश मानले जात आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा