Headlines

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाचं खास नियोजन; चाकरमान्यांसाठी २,७५८ बसगाड्या कोकण मार्गावर धावणार ,कालावधी ९ ते १३ सप्टेंबर


Thane News:गणेशोत्सव काहीच दिवसांवर आलेला असताना कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाला तिकिटांसाठी खुप त्रास सहन करावा लागलत आहे.अशातच गावी जाणाऱ्यांना एसटीच्या ठाणे विभागाने २,७५८ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी जादा गाड्या
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,ठाणे : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटीच्या ठाणे विभागाने यंदा २ हजार ७००हून अधिक बसगाड्यांचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक बस सोडण्यात येणार असून, आतापर्यंत ३४० बसचे ग्रुप बुकिंग झाले आहे. तसेच ३००हून अधिक बस पूर्ण आरक्षित झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर

गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आला असून, सर्वत्र तयारीची लगबग सुरू आहे. गणपतीच्या आरासासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून, खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. गणपतीचे आगमन कधी होते, याची प्रत्येकाला आतुरता लागली आहे. शहरांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले अनेक नागरिक दरवर्षी कुटुंबासह गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील मूळ गावी जातात.

तिकिटांच्या दरांत भरमसाट वाढ

त्यामुळे या काळात रेल्वेगाड्या आधीच हाउसफुल्ल होतात. रेल्वेचे तिकीट न मिळाल्यास नागरिकांना प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसचा पर्याय स्वीकारावा लागतो. मात्र, खासगी बसच्या तिकिटांचे अव्वाच्या सव्वा दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. त्यात गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक तिकिटांच्या दरांत भरमसाट वाढ करतात.

Maharashtra TimesAnna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईला हलवलं; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू

२ हजार ७५८ बसगाड्यांचे नियोजन

त्यामुळे प्रवाशांना दुहेरी कोंडीचा सामना करावा लागतो. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त जादा बस सोडण्यात येतात. यंदाही एसटीच्या ठाणे विभागाने कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एकूण २ हजार ७५८ बसगाड्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत या ठिकाणांहून बस सोडण्यात येणार

९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत भांडुप, मुलुंड, ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी, मिरा-भाईंदर, बोरीवली आदी ठिकाणांहून कोकणातील विविध मार्गांवर बस सोडण्यात येणार आहेत. आतापर्यंत ३४० बसचे ग्रुप बुकिंग झाले असून, ३०० हून अधिक बस पूर्ण आरक्षित झाल्या आहेत.गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त २ हजार ६३३ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

Maharashtra TimesThane News: ठाण्याला १६.५४ किमी लांबीचा ‘आनंद ग्रीन बेल्ट’; दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न

ग्रुप बुकिंगसाठी ५५ आसानी बसला प्राधान्य

काही कारणास्तव ग्रुप बुकिंगसाठी ५५ आसनी बस देण्याची सूचना एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सध्या ठाणे विभागात ५५ पेक्षा कमी आसने असलेल्या बसचे ग्रुप बुकिंग थांबवण्यात आले आहे. ग्रुप बुकिंगसाठी प्रवासी आल्यास त्यांना ५५ आसनी बसचे बुकिंग करण्याविषयी एसटीच्या अधिकाऱ्यांकडून विनंती केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा