Headlines

ओल्या नारळाची पाकातील खुसखुशीत पुरी,अशी हटके रेसिपी कधीच पाहिली नसेल – how to make pakatil khuskhushit puri recipe shraed by tejashri murkute dokhe


सणावारासाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल, तर ओल्या नारळाची पाकातील खुसखुशीत पुरी नक्की करून पाहा.नारळ, रवा आणि मैद्यापासून तयार होणारी ही पुरी पाकात मुरवल्यानंतरही छान कुरकुरीत राहते. तेजश्री डोखे यांनी शेअर केलेली ही सोपी आणि युनिक रेसिपी पाहुण्यांनाही नक्कीच आवडेल.

पाकातील खुसखुशीत पुरी
फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी
सणावार म्हटलं की घरात वेगवेगळे गोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. पुरणपोळी, लाडू, करंजी, अनारसे यांसोबत एखादा हटके आणि चविष्ट पदार्थ बनवायचा असेल, तर ओल्या नारळाची पाकातील खुसखुशीत पुरी नक्की करून पाहा. ही पुरी चवीला अप्रतिम, दिसायला आकर्षक आणि खायला अगदी खुसखुशीत लागते. विशेष म्हणजे पुरी पाकात घातल्यानंतरही लगेच नरम पडत नाही. त्यामुळे एकदा बनवल्यानंतर काही दिवस हवाबंद डब्यात ठेवूनही तिचा आनंद घेता येतो. ही रेसिपी तेजश्री डोखे यांनी शेअर केलेली असून, घरच्या साध्या साहित्यामध्ये सहज करता येते. पुरी चांगली फुलावी, खुसखुशीत व्हावी आणि पाकात घातल्यानंतरही तिचा कुरकुरीतपणा टिकून राहावा यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या रेसिपीमध्ये सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी)

लागणारे साहित्य

लागणारे साहित्य

पुऱ्यांसाठी
१½ कप मैदा
½ कप बारीक रवा
१ वाटी ओला नारळ
२ ते ३ चमचे दही
२ चमचे कडकडीत गरम तेल किंवा तूप
२ चिमूट मीठ
आवश्यकतेनुसार थोडे पाणी, गरज भासल्यास
साखरेच्या पाकासाठी
१ कप साखर
½ कप पाणी
४ ते ५ केशराच्या काड्या
½ लिंबाचा रस

तळण्यासाठी
आवश्यकतेनुसार तेल

ओल्या नारळाची पेस्ट तयार करण्याची पद्धत

ओल्या नारळाची पेस्ट तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम ओल्या नारळाची काळी साल पूर्णपणे काढून घ्या. नारळाचे छोटे-छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालून नारळ बारीक वाटून घ्या.या रेसिपीमध्ये दह्याचा वापर करण्यामागे एक खास कारण आहे. नारळाला दह्यामुळे थोडासा ओलावा मिळतो आणि तो मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होऊन मऊसूत पेस्ट तयार होते. नारळाचे मोठे कण राहिल्यास पुरीची पोत तितकी चांगली येत नाही. त्यामुळे पेस्ट शक्य तितकी बारीक आणि एकजीव करून घ्यावी. दही नसेल तर ताक किंवा थोडे पाणी वापरूनही नारळ वाटता येतो. मात्र दह्यामुळे या पुऱ्यांना एक वेगळीच चव मिळते आणि त्या बालुशाहीसारख्या स्वादिष्ट लागतात.

कणीक भिजवताना लक्षात ठेवा ही महत्त्वाची गोष्ट

कणीक भिजवताना लक्षात ठेवा ही महत्त्वाची गोष्ट

एका मोठ्या परातीत मैदा चाळून घ्या. त्यामध्ये बारीक रवा आणि दोन चिमूट मीठ घाला. आता यामध्ये दोन चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला.गरम तेल थेट पिठात घालताना काळजीपूर्वक घाला आणि मैदा-रव्यामध्ये ते चांगले चोळून मिसळा. प्रत्येक कणाला तेलाचा अंश लागला पाहिजे. मोहन योग्य प्रमाणात आहे की नाही हे तपासण्यासाठी थोडे पीठ हातात घेऊन घट्ट दाबा. त्याचा सहज मुटका बांधला गेला तर मोहन योग्य झाले आहे.

पाकातील खुसखुशीत पुरी

पुरी पुरेशी खुसखुशीत होण्यासाठी

पुरी पुरेशी खुसखुशीत होण्यासाठी

मोहन कमी झाले तर पुरी पुरेशी खुसखुशीत होणार नाही आणि जास्त झाले तर कणीक व्यवस्थित बांधली जाणार नाही. त्यामुळे दोन चमचे हे प्रमाण महत्त्वाचे आहे.आता तयार केलेली ओल्या नारळाची पेस्ट या मिश्रणामध्ये घाला. नारळाच्या पेस्टमध्ये दही असल्यामुळे अतिरिक्त पाणी घालण्याची गरज जवळजवळ भासत नाही. सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर कणीक भिजवून घ्या.कणीक सैलसर ठेवू नका. कणीक जर जास्त मऊ किंवा सैल झाली तर तळल्यानंतर पुरी लवकर नरम पडण्याची शक्यता असते.

एकतारी साखरेचा पाक

एकतारी साखरेचा पाक

कणीक बाजूला ठेवून आता पाक तयार करून घ्या. एका भांड्यात एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घाला. साखर पूर्णपणे विरघळू द्या.साखर विरघळल्यानंतर पाकाला चांगली उकळी आली की त्यामध्ये चार ते पाच केशराच्या काड्या आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस घातल्यामुळे पाकामध्ये साखरेचे स्फटिक तयार होण्याची शक्यता कमी होते.या पुऱ्यांसाठी पाक ना खूप पातळ हवा ना खूप घट्ट. एकतारी पाक तयार करायचा आहे.पाक तपासण्यासाठी दोन बोटांमध्ये थोडासा पाक घ्या. तो थोडा थंड झाल्यावर बोटे अलगद दूर करा. बोटांमध्ये हलकीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करा. पाक जास्त आटवू नका, अन्यथा तो थंड झाल्यावर साखरेसारखा घट्ट होऊ शकतो.

पुऱ्या लाटण्याची योग्य पद्धत

पुऱ्या लाटण्याची योग्य पद्धत

आता कणीक मळून हलकीशी मऊ करून घ्या. तिचे तीन मोठे गोळे करून घ्या. यामुळे सर्व पुऱ्या साधारण समान आकाराच्या तयार होतील.एक गोळा घेऊन हाताने थोडा पसरट करा. आता कोणतेही कोरडे पीठ न वापरता मोठी पोळी लाटून घ्या. पोळी लाटताना ती अधूनमधून उलटवत लाटा. दोन्ही बाजूंनी समान जाडी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ही पोळी नेहमीच्या पुरीपेक्षा थोडीशी पातळ लाटायची आहे. खूप जाड लाटल्यास पुरी तळताना आतून जाड राहू शकते आणि नंतर पाकात गेल्यावर लवकर नरम पडते. मात्र अतिशय पातळ लाटल्यास पुरी छान फुलणार नाही.

पुऱ्या तळण्याचे खास रहस्य

पुऱ्या तळण्याचे खास रहस्य

या रेसिपीमध्ये पुऱ्या कशा तळल्या जातात याला विशेष महत्त्व आहे.कढईतील तेल सुरुवातीला मध्यम गरम असावे आणि गॅस मोठा ठेवावा. तेलात एक पुरी सोडा. ती फुलू लागली की दुसरी आणि तिसरी पुरी सोडू शकता.सुरुवातीला गॅस मोठा असल्यामुळे पुऱ्या छान फुगतात. पुऱ्या फुलल्यानंतर लगेच गॅस कमी करा आणि त्या मंद आचेवर तळा. यामुळे पुऱ्यांना आतून आणि बाहेरून व्यवस्थित कुरकुरीतपणा येतो.

पाकात पुरी घालताना सर्वात महत्त्वाची टिप

पाकात पुरी घालताना सर्वात महत्त्वाची टिप

पुऱ्या तळून झाल्यानंतर त्यांना पाकात घालण्याची वेळ येते. येथे एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे.पाक पूर्णपणे थंड झाल्यानंतर तो फक्त हलका कोमट करून घ्या. पाक खूप गरम असता कामा नये. गरम पाकामध्ये पुऱ्या घातल्यास त्या नरम पडू शकतात. दुसरीकडे पाक अगदी थंड असेल तर पुरी पाक व्यवस्थित शोषून घेणार नाही.त्यामुळे पाकाला फक्त हलकासा कोमटपणा असावा. तळलेल्या पुऱ्या पाकात घालून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बुडवा आणि साधारण एक-दोन मिनिटे पाकात राहू द्या.

पाक निथळण्यासाठी ही युक्ती वापरा

पाक निथळण्यासाठी ही युक्ती वापरा

एक मोठे ताट घ्या आणि त्याची एक बाजू थोडी उंच राहील अशा पद्धतीने ते तिरके ठेवा. एका बाजूला छोटे झाकण किंवा आधार ठेवला तर ताटाला उतार मिळेल.पाकातून काढलेल्या पुऱ्या या ताटावर ठेवा. त्यांच्यासोबत आलेला अतिरिक्त पाक हळूहळू खाली निथळेल. त्यामुळे पुऱ्यांवर अतिरिक्त पाक साचणार नाही आणि त्यांचा खुसखुशीतपणा टिकून राहण्यास मदत होईल.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा