महापौर रितू तावडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असून आता पुन्हा महापौर बंगल्यावरून रितू तावडे यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. महापौर होऊन ६ महिने होत नाहीत तोच महापौरांना नवी गाडी आणि नवा बंगला पाहिजे, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. याशिवाय मुंबईतील मोकळ्या जागा भाजपकडून हडपल्या जात असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला.