Headlines

भाग्यश्री खचून गेलेली, तिने विचारही केला नव्हता, नवरा… नंदुरबारमध्ये खळबळ


Nandurbar Crime News : नंदुरबारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहिता खचून गेली होती. खूप विचार केला पण शेवटी ज्याची भीती तेच घडलं? जाणून घ्या.

Nandurbar Crime
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील , नंदुरबार : शहादा शहरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. भाग्यश्री गौरव चौधरी (२९) या विवाहितेने रमकूबाईनगर परिसरातील आपल्या घरात गळफास घेतला. तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत भाग्यश्री हिला तिचा पती गौरव चौधरी याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. याच त्रासामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज तिच्या वडिलांनी, सुनील बन्सी चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या आरोपांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Maharashtra TimesMumbai Crime: मुंबईत मद्य, मादक पदार्थांचा महापूर! निवडणूक काळात 45 कोटींचे अमली पदार्थ जप्त, 29 जणांवर गुन्हे दाखल
या घटनेनंतर मयत भाग्यश्रीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी तातडीने शहादा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार छोटुलाल शिरसाठ करत आहेत.
Maharashtra TimesMumbai Local: ट्रेनला लटकून प्रवास, अचानक हात सटकला अन् अनर्थ; धावत्या लोकलमध्ये क्षणात होत्याचं नव्हतं
शवविच्छेदन अहवालानंतर भाग्यश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत विवाहितेच्या आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने एका तरुण विवाहितेचा अकाली मृत्यू झाला असून, यामागील सत्य काय आहे, हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश आणि घरातील परिस्थितीची पाहणी केली जात आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ते कायदेशीर कलम लावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा