Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तिन्ही गुण नियंत्रणात ठेवा,‎ व्यक्तिमत्त्व सकारात्मक होईल




ईश्वराने माणसाच्या अंत:करणात जीवन चालवणारी अशी कोणती‎व्यवस्था केलेली असेल बरे? संत-महात्मे तिला त्रिगुण व्यवस्था असे‎म्हणतात. आपले जीवन तीन गुणांद्वारे चालते. सत्त्वगुण म्हणजे आपण‎चांगली कर्मे करतो, रजोगुण आपल्या लाभ-हानीच्या विचारांना चालना‎देतो, तर तमोगुण चुकीच्या मार्गाकडे नेतो. पैकी प्रभावी गुणामागे उर्वरित‎दोन गुण चालतात. गोस्वामी तुलसीदासांनी लिहिले आहे “माया बस्य‎जीव अभिमानी, ईस बस्य माया गुन खानी.” म्हणजे अभिमानी जीव‎मायेच्या अधीन असतो आणि तीनही गुणांची खाण माया ही ईश्वराच्या‎अधीन असते. तुलसीदासांच्या मते, जीवनात अहंकार मायेच्या‎प्रभावाखाली असतो. मायेला तीन गुणांची खाण म्हणतात. जीवनात‎सत्त्वगुण वाढवायचा झाल्यास ईश्वराशी नाते जोडावे. सोप्या भाषेत‎सांगायचे तर सत्त्वगुण म्हणजे सकारात्मकता. परमेश्वराशी जोडण्याचे‎प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. मात्र जीवनात संतुलन राखले,‎तर हे तीनही गुण नियंत्रणात राहून व्यक्तिमत्त्व सकारात्मकतेने परिपूर्ण‎होईल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत