![]()
बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्यानिकालाने काहींना धक्का दिला आहे तर काहींना विचारकरायला भाग पाडले. सामान्यपणे पोटनिवडणुकांतमतदार सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने मतदानकरतात. या तर्कानुसार बांकीपूरमध्ये भाजपच मतदारांचीपहिली पसंती असायला हवा होता. मात्र, निकालयाउलट लागले. अर्थात, सत्ताधारी पक्षाचे उमेदवारपोटनिवडणुकीत कधीच पराभूत होत नाहीत, असे नाही.मात्र, भाजपसाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजेघटलेला मतांचा टक्का. या विधानसभा मतदारसंघातून पक्षाने सलग नऊ निवडणुका जिंकल्या होत्या आणिप्रत्येक वेळी 60 टक्क्यांहून अधिक मते मिळवली होती. मात्र, अलीकडील पोटनिवडणुकीत पक्षाचा मतांचाटक्का घसरला आहे. हा निकाल नव्याने स्थापन झालेल्या जन सुराज पक्षापेक्षा (जेएसपी) अधिक प्रशांत किशोर यांचा विजय मानला जाईल. कारण 2025 च्या बिहार विधानसभानिवडणुकीत जेएसपीला प्रभाव पाडता आला नव्हता. गुजरातमधील मंजलपूर मतदारसंघात भाजपला मोठ्या मताधिक्याने विजय मिळाल्याने पक्ष आनंद साजरा करू शकतो. मात्र, मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघातआणखी एक धक्का बसला. येथे काँग्रेसचे उमेदवारघनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचापराभव केला. बांकीपूर हा भाजपचा मजबूत बालेकिल्लाराहिला आहे. 1995 नंतर या जागेवर पक्षाचा कधीहीपराभव झाला नव्हता. गेल्या पाच वर्षांतीलपोटनिवडणुकांची आकडेवारी पाहिली तर या काळातसत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांचा विजयाचा दर 78टक्के राहिला आहे, तर विरोधकांचा यशाचा दर केवळ22 टक्के होता. याच वर्षी सात जागांवर पोटनिवडणुकीतसर्व जागा सत्ताधारी पक्ष व आघाड्यांनी जिंकल्याहोत्या. त्यापैकी पाच जागा भाजप-एनडीएने, तर दोनजागा कर्नाटकमध्ये काँग्रेसने जिंकल्या. 2025 मध्ये 15जागांवर पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी नऊ जागांवरसत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांनी विजय मिळवला, तरविरोधी उमेदवार सहा जागी विजयी झाले. 2024 मध्ये 86 जागांवर पोटनिवडणुका झाल्या होत्या.त्यापैकी 69 जागांवर सत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांनीविजय मिळवला, तर विरोधकांना 17 जागांवर यशमिळाले. मात्र, बांकीपूरमधील पराभवामुळे भाजपसमोरअनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या मतदारसंघाचे प्रथमप्रतिनिधित्व 1995 मध्ये विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्षनितीन नवीन यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हायांनी केले होते. त्यांनी जनता दलाचे रामानंद यादव यांचातीन टक्क्यांपेक्षाही कमी मताधिक्याने पराभव करून हीजागा जिंकली होती. त्यानंतर या जागेवर भाजपने सलगवर्चस्व राखले. 1995 ते 2006 या कालावधीत नवीनकिशोर प्रसाद सिन्हा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्वकेले. त्यांच्या निधनानंतर 2006 मध्ये झालेल्यापोटनिवडणुकीत नितीन नवीन येथून निवडून आले.त्यांनी या मतदारसंघातून सलग पाच निवडणुकाजिंकल्या. 2006 च्या पोटनिवडणुकीत त्यांना विक्रमी 82टक्के मते मिळाली होती. त्यानंतरही जवळपास प्रत्येकनिवडणुकीत त्यांनी 60 टक्क्यांहून अधिक मतेमिळवली. केवळ 2020 मध्ये त्यांना 59.05 टक्के मतेमिळाली होती. बिहारमध्ये दुहेरी इंजिनचे सरकारअसतानाही बांकीपूरमध्ये भाजपचा मतदाराधार 28टक्क्यांहून अधिक कसा घसरला, हे अद्याप स्पष्टझालेले नाही. बांकीपूरमध्ये उमेदवार बदलण्याचा आणिदतियामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांनाउमेदवारी न देण्याचा निर्णय ही भाजपची रणनीतिक चूकहोती का? सत्ताधारी पक्षाविषयी मतदारांच्या भूमिकेतझालेला बदल मंजलपूर आणि दतियामध्ये का दिसलानाही? प्रश्न उपस्थित करणे सोपे आहे, मात्र त्यांची उत्तरेशोधणे तितके सोपे नाही. संख्येने या केवळ तीनपोटनिवडणुका असल्या, तरी त्यांचे निकाल महत्त्वाचेआहेत. प्रत्येक निवडणूक भाजप अत्यंत गांभीर्याने घेतअसल्याबाबत कोणतीही शंका नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बांकीपूरमध्ये भाजपच्या मतांच्याटक्केवारीतील घट ही पक्षासाठीसर्वात मोठी चिंतेची बाब ठरू शकते.या मतदारसंघातून पक्षाने सलग नऊनिवडणुका जिंकल्या होत्या. प्रत्येकनिवडणुकीत 60 टक्क्यांवर मतेमिळवली होती . पोटनिवडणुकीतमतांचा टक्का घटला.
Source link
संजय कुमार यांचा कॉलम:पोटनिवडणूक निकाल भाजपला आत्मपरीक्षणास भाग पाडतील
