साधू- महंतांची उपस्थिती
यावेळी विविध साधू-महंत, आमदार हिरामण खोसकर, शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांसह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘अतिथी देवो भव’ या भावनेतून भाविकांना सुविधा
मंत्री भुजबळ म्हणाले की, कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने रस्ते, वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा सक्षम करण्यात येत आहेत. जलस्रोत स्वच्छ ठेवून ‘अतिथी देवो भव’ या भावनेतून भाविकांना सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच, विकासकामे पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Malshej Ghat : पावसाचं रौद्ररुप, घाटात रस्ता खचला, माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद
विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता
आमदार हिरामण खोसकर यावेळी म्हणाले, ग्रामपंचायत, तीर्थक्षेत्र विकास समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ‘अतिथी देवो भव’या भावनेतून भाविकांना सुविधा त्यांनी केले.
श्रीक्षेत्र कपिलधारा हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे
महंत रामनारायण दास फलाहारी महाराज म्हणाले, कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत. वैष्णव अखाड्यांच्या प्रतिनिधींनी कपिलधारा येथे पारंपरिक स्नानाची निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर करून सिंहस्थ प्राधिकरणाच्या नियोजनात या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली. जगतगुरू आदिनाथ संप्रदाय पिठाधीश्वर कल्कीराम महाराज म्हणाले, श्रीक्षेत्र कपिलधारा हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
त्याच्या धार्मिक वारशाचे जतन करण्याबरोबरच भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी शासनाचा विविध विकास निधी आणून सर्वांगीण विकास हा सर्व लोकप्रतिनिधी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल.
पारंपारिक स्नानाची तारीख जाहीर करा
कार्यक्रमप्रसंगी वैष्णव अखाड्यांच्या प्रतिनिधींनी कपिलधारा येथील पारंपरिक स्नानाची निश्चित तारीख १७ ऑगस्ट २०२७ ही अधिकृतपणे जाहीर करावी आणि सिंहस्थ प्राधिकरणाच्या मुख्य नियोजनात या क्षेत्राचा समावेश करावा, अशी महत्त्वाची मागणी शासनाकडे केली.
. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर भागात व्यापक पायाभूत सुविधांचे नियोजन
.रस्ते , वाहतूक, स्वच्छता आणि निवासाच्या सुविधांवर विशेष भर
.स्थानिक पर्यटन व अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे शासनाचे उद्दिष्ट्

