![]()
आपल्या आजूबाजूचे जग बहुतांश नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाकितीतरी वेगाने बदलत आहे. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसलेले तंत्रज्ञान आज संपूर्ण उद्योगांचे स्वरूप बदलत आहेत. व्यवसाय मॉडेल्स उभारण्यासाठी दशके लागली. ती काही महिन्यांतच डळमळीत होत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याकडे असलेला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अनुभव नव्हे, तरसातत्याने शिकत राहण्याची तयारी. सहा दशकांत मी जगभरातील अनेक नेत्यांसोबत कामकेले. काही नेते दीर्घकाळ टिकतात, मजबूत संस्थाउभ्या करतात व अनेक दशकांपर्यंत सुसंगत राहतात.त्यांच्यात एक समान सवय आढळते. ते आपलीजिज्ञासा कधीच संपुष्टात येऊ देत नाहीत. त्यांना आपण सर्व काही जाणतो, असा कधीच भ्रम होत नाही. कारण नेतृत्व हे एखादे अंतिम ध्येय नसून अखंड प्रवास आहे. अलीकडच्या काळात तरुण नेत्यांसोबत चर्चा करतानाएक महत्त्वाचा प्रश्न वारंवार समोर आला आहे—भरपूर संसाधने असूनही अनेक कंपन्या अपयशी का ठरतात? याचे उत्तर जवळपास नेहमी एकच असते. एखाद्या टप्प्यावर नेतृत्वाने शिकणे थांबवलेले असते.त्यांनी प्रश्न विचारणे सोडून दिलेले असते. काल यशस्वी ठरलेले सूत्र उद्याही तितकेच परिणामकारक ठरेल, असात्यांचा समज झालेला असतो. पण प्रत्यक्षात तसे कधीचघडत नाही. डिजिटल परिवर्तनाचे उदाहरण घ्या. अनेकमोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान प्रकल्पांवर प्रचंड गुंतवणूककेली तरी त्या अपयशी ठरल्या. त्यामागची कारणेक्वचितच तांत्रिक असतात; ती मानवी असतात. बदलस्वीकारण्याची क्षमता नसते. मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांची बांधिलकी दिसून येत नाही. संस्थेनेभावनिक व व्यावहारिक पातळीवर बदल स्वीकारलेलानसतो. केवळ तंत्रज्ञान कंपनी बदलू शकत नाही; ते कामनेतृत्व करते. एलअँडटीसारख्या कंपन्यांचे यश दाखवतेकी नेतृत्व पूर्णपणे कटिबद्ध असेल, बदल स्वीकारणेसंस्थेच्या संस्कृतीचा भाग बनला असेल आणि संपूर्णसंस्था एकत्र पुढे सरकली, तर मोठे परिवर्तन शक्य होते.नेतृत्व म्हणजे ऊर्जाही आहे. एखाद्या एकट्या प्रतिभावानव्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण संघात निर्माण होणाऱ्याऊर्जेची. मी पाहिलेले सर्वोत्तम नेते केवळ वर्चस्वगाजवत नाहीत; तर ते त्या वातावरणात ऊर्जा निर्माणकरतात. ते आपल्या सहकाऱ्यांमधील सर्वोत्तम विचारबाहेर आणतात. कल्पना कुठूनही समोर येऊ शकतील,असे वातावरण ते तयार करतात. याच ठिकाणी मी अशाशिकवणीकडे येतो. माझा आता दृढ विश्वास आहे—बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक प्रभावी असते. बहुतांश नेतेइतरांवर प्रभाव पाडण्यात बराच वेळ घालवतात; पणसमजून घेण्याचा प्रयत्न कमी करतात. प्रत्यक्षात खरीताकद ऐकण्यात असते. आपण ऐकतो, तेव्हा ग्राहकांनानेमके काय हवे आहे. कर्मचारी कोणत्या अनुभवातूनजात आहेत आणि बाजार कोणते संकेत देत आहे, हेसमजते. पण आपण सतत बोलत राहिलो, तरआपल्यालाच फक्त स्वतःचा आवाज ऐकू येतो. आधीस्वतः समजून घ्या. मग इतरांनी आपल्याला समजूनघ्यावे, अशी अपेक्षा ठेवा. व्यवसायविश्वात आयुष्य हेअनेक क्षणांची साखळी असते. काही क्षण छोटेअसतात, तर काही आयुष्य बदलणारे ठरतात. मात्रत्यांच्यात एक समान गोष्ट असते— ते कोणाची वाटपाहत नाहीत. संकोच करणारा, पूर्ण खात्री झाल्याशिवायपाऊल टाकत नाही, त्याला उशिरा का होईना हे जाणवतेकी संधी हातातून निसटून गेली आहे. मी हे अनेकदा घडताना पाहिले आहे. नोकियाच्याअध्यक्षांनी आयफोनचे आगमन पाहिले होते.त्यांच्याकडे संसाधने होती. क्षमता होती आणि बाजारातमजबूत स्थानही होते. तरी काहीतरी त्यांना त्याबदलाच्या लाटेवर स्वार होण्यापासून रोखून धरत होते.प्रत्येक नेत्याने स्वतःला एवढेच विचारू नये की त्यालासंधी दिसते का; तर त्याने त्या संधीचा लाभ घेण्यासाठीआवश्यक सवयी, विचारसरणी व धाडस स्वतःमध्येविकसित केले आहे का, हेदेखील तपासावे. याच गोष्टीमहान नेत्यांना चांगल्या नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात.तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा व शिस्तबद्धपणेतिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा जास्त ऐका. इतरांनाविचारण्याची भीती वाटते असे प्रश्न विचारा. संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका. पुढे व्हा. कारणकधीही शिकणे थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे हे जगआहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.) तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा आणि शिस्तीने तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षाअधिक ऐका. इतरांना विचारण्याची भीतीवाटते असे प्रश्न विचारा. आणि संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका— पुढेव्हा.
Source link
डॉ. राम चरण यांचा कॉलम:शिकणे कधी थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे जग असते
