Headlines

आता ‘जेन-झी’ला बोलणेही मुश्किल; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे वक्तव्य |Maharashtra Times


म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘जेन-झी भारताचे भविष्य आहे. पण, सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही. त्यांना काही बोलणेदेखील मुश्किल झाले आहे,’ असे वक्तव्य पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रविवारी केले.

भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील बोलत होते.

Maharashtra TimesNagpur Crime : आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, घाटावर बोलावून मित्रानेच केला घात, चौघांनी मिळून एकाला संपवलं; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी पोहोचताच…
व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सचिव राहुल दीक्षित, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल अमरेंद्र हरदास, भोसला मिलिटरी स्कूलचे मुख्याध्यापक अजय शिर्के आणि भोसला सैनिक स्कूलचे मुख्याध्यापक जे. एस. रिआर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नांगरे पाटील म्हणाले, ‘सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढला आहे. सेकंदागणिक मन स्क्रोल होत आहे. त्यातून ‘केमिकल लोचा’ निर्माण झाला आहे. बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गुणांकासह कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमताही प्रत्येकामध्ये असायला हवी. यासाठी उमलत्या वयापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

Maharashtra TimesDevendra Fadnavis: पंढरपूरहून अचानक दिल्ली गाठली, महाराष्ट्रात बदलाचे वारे? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला!
कारगिल युद्धाचा उल्लेख करताना ते म्हणाले, ‘अत्यंत विपरीत परिस्थितीत आपल्या वीर सैनिकांनी प्राणांची आहुती देत युद्ध जिंकले. कारगिल विजय दिवस हा युद्धातील विजयाचा जल्लोष करण्याबरोबरच देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणाचाही दिवस आहे.’

कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांचा रूट मार्च काढण्यात आला. कार्यक्रमस्थळी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कमांडंट कर्नल अमरेंद्र हरदास यांनी कारगिल युद्धाची माहिती दिली. सूत्रसंचालन सुमेधा चावरे यांनी केले, तर आभार अजय शिर्के यांनी मानले.

‘आठ दिवसांपासून अधिक शिव्या खातोय’
‘पोलिस असो वा सीमेवरील जवान, त्यांची ड्युटी ही थँकलेस जॉब आहे. कितीही काम केले, तरी पोलिसांना शिव्या बसतातच. गेल्या आठ दिवसांपासून तर मी अधिकच शिव्या खातोय,’ असे सांगत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील अलीकडच्या हत्यासत्रामुळे पोलिसांवर होत असलेल्या टीकेला मिश्किल शैलीत उत्तर दिले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत