Headlines

Why Does Bengaluru Make Me So Lazy Comedians Weather Joke Goes Viral | बेंगळुरूमधील लोकं नोकरीला कशी जातात? स्टँड-अप कॉमेडियनचा व्हिडिओ व्हायरल; म्हणे, ३ कप चहा घेऊनही झोप उडेना


Bengaluru Viral Video:बेंगळुरूच्या थंड आणि आल्हाददायक हवामानामुळे स्टँड-अप कॉमेडियन शुभम पुजारीला काम करण्याऐवजी सतत आराम करण्याचीच इच्छा होत आहे. चार कप चहा पिऊनही त्याचा आळस काही जात नसल्याचं तो म्हणतो. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकरी बेंगळुरूच्या आल्हाददायक वातावरणाचं कौतुक करत आहेत.

Bangalore Climate
(फोटो सौजन्य – Abhinand Anilkumar/pexels.com, notsopujari/Instagram)
पाऊस पडून गेल्यामुळे बेंगळुरूमधील उकाडा आता कमी झाला असून वातावरण पुन्हा एकदा आल्हाददायक झालं आहे. आल्हाददायक हवामान हे बेंगळुरूचं मोठं आकर्षण मानलं जातं. वास्तविक, बेंगळुरूमध्येही लोकांचं जीवन मुंबई, पुणे आणि दिल्लीसारखंच धकाधकीचं आहे. मात्र, तेथील वातावरण चांगलं असल्यामुळे लोकांचा पाय तिथून निघत नाही. पण हेच सुंदर वातावरण एका तरुणासाठी त्याच्या त्रासाचं कारण बनलं आहे. तो म्हणतोय, या वातावरणात त्याला इतका आळस येतो की आता हे शहरच त्याला नकोसं वाटू लागलं आहे. अंगावर चादर ओढून दिवसभर झोपून राहावं, सतत आराम करावा, असंच त्याला वाटतं. आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं, असा प्रश्न तो नेटकऱ्यांना विचारत आहे.

नेमकं काय म्हणाला तरुण?

​ ​

हा व्हिडिओ notsopujari या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचं नाव शुभम पुजारी आहे. तो दिल्लीस्थित स्टँड-अप कॉमेडियन आणि कंटेंट क्रिएटर आहे. एका स्टँड-अप शोच्या निमित्ताने तो बेंगळुरूमध्ये आला होता. दरम्यान, येथील लोकांची लाइफस्टाइल पाहून तो अवाक् झाला.

तो म्हणतो, बेंगळुरूचं थंड, ढगाळ आणि आल्हाददायक हवामान इतकं आरामदायी आहे की, त्याच्याकडून कोणतंच काम होत नाही. दर दोन-तीन महिन्यांनी स्टँड-अप शोसाठी बेंगळुरूला गेल्यावर त्याला दिवसभर ब्लँकेटमध्ये पडून राहावं, मोबाईल स्क्रोल करावा आणि झोपावं, असंच वाटतं.

पुढे तो प्रश्न विचारतो, बेंगळुरूतील लोक रोज सकाळी उठून ऑफिसला कसे जातात? रोज ऑफिसला जाण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळते? कारण दोन-तीन कप चहा घेऊनही त्याचा आळस काही जात नाही. या व्हिडिओच्या शेवटी तो मिश्कीलपणे म्हणतो, “बेंगळुरूमध्ये काम करण्यासाठी काही खास ट्रेनिंग दिलं जातं का? कारण तुम्ही जर दुसऱ्या कुठल्याही शहरात गेलात, तर तिथे UPSC परीक्षाही पहिल्याच प्रयत्नात पास व्हाल.”

बेंगळुरूचं वातावरण इतकं सुंदर का आहे?

​ ​

हा व्हिडिओ १ लाख ५२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत या तरुणाच्या मतांशी सहमती दर्शवली आहे. काही जण म्हणत आहेत, “मोठ्या मुश्किलीनं आम्ही ऑफिसला जातो.”

असो, बेंगळुरू हे शहर देशातील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत अधिक थंड आणि आल्हाददायक मानलं जातं. कारण हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० मीटर उंचीवर आहे. आपल्या मुंबई-पुण्याच्या भाषेत सांगायचं झालं, तर बेंगळुरू हे माथेरानपेक्षाही जवळपास १०० मीटर अधिक उंचीवर आहे. त्यामुळे वर्षभर येथे तुलनेने थंड वातावरण असतं. शिवाय शहरातील झाडे, उद्याने आणि तलावांमुळे नैसर्गिक गारवा टिकून राहतो. त्यामुळेच बेंगळुरूला ‘गार्डन सिटी’ असंही म्हटलं जातं. पावसाळ्यात तर येथील थंड हवामान आणि हिरवळ शहराला आणखी प्रसन्न बनवते.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा