Headlines

Eknath Shinde Targets Uddhav Thackeray Over Hindutva & Ramraksha Statement


शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ टीका करताना म्हटले की, ज्यांनी कधीकाळी रामभक्तांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली, हिंदुत्वाच्या राजकारणाला स्वतःची चूक म्हटले आणि सत्तेसाठी काँग्रेसशी युती के

.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने ज्यांच्याशी हातमिळवणी केली, त्या लोकांनी वेळोवेळी हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना विरोध केला आहे. अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने हिंदुत्वाचा मार्ग आधीच सोडला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, “गर्वाने सांगा, आम्ही हिंदू आहोत.” इतक्या वर्षांनंतर आता उबाठाला ही घोषणा आठवली आहे. हिंदुत्व हा असा कपडे नाही की, हवा तेव्हा उतरवायचा आणि हवा तेव्हा पुन्हा परिधान करायचा. त्यामुळे रामरक्षेची भाषा करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या पक्षाची आणि स्वतःच्या विचारसरणीची रक्षा करावी.

ते पुढे म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी १४ वर्षांचा वनवास स्वीकारला होता. मात्र ज्यांनी स्वतःच्या वडिलांचे विचार आणि तत्त्वे अर्ध्या वाटेत सोडून दिले, त्यांना प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हे लोक रामरक्षा नव्हे, तर स्वतःच्या पक्षाच्या रक्षणासाठी हा प्रयत्न करत आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, जर त्यांना खरोखरच रामरक्षा आंदोलन करायचे होते, तर सर्वप्रथम आपल्या सहयोगी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांना त्याचे निमंत्रण द्यायला हवे होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करायला हवे होते.

ते म्हणाले की, हेच लोक पूर्वी विचारत होते की राम मंदिर कधी बांधले जाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० देखील हटवण्यात आले. आज जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयांचे मनापासून स्वागत केले असते. मात्र उबाठाचे नेते आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत, जरी त्यांच्या नेतृत्वाखाली देश सातत्याने प्रगती करत आहे.

एकनाथ शिंदे की, महाराष्ट्राची जनता अत्यंत सुजाण आहे. २०१९ मध्ये सत्तेच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केली. जनतेने निवडणुकीत त्याचे चोख उत्तर दिले आणि त्यांना त्यांची खरी जागा दाखवून दिली.

हे ही वाचा…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक राजकीय फटका बसला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या ६ खासदारांच्या स्वतंत्र गटाला अखेर लोकसभा सचिवालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीन होण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केल्यामुळे आता हे ६ बंडखोर खासदार तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या शिंदे यांच्या पक्षाचाच अधिकृत भाग बनले आहेत. सविस्तर वाचा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत