पश्चिम विदर्भात ४५ टक्के क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात येते. याखालोखाल सोयाबीन ४० टक्के, तर उरलेल्या भागात डाळ, ज्वारीची लागवड केली जाते.
उपकार दुधाचे आई, मातेच्या शोधासाठी नेदरलँडचा महापौर नागपुरात, चित्रपटाला शोभेल अशी खरीखुरी कहाणी
शेत खरडून गेल्याने उत्पन्नाची आशा सुरुवातीलाच मावळली होती. यातून तग धरलेल्या पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. हे सारे संकट सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतामालाच्या भावाने दगा दिला. हाती आलेल्या पिकांतून लागवड खर्चही निघणे कठीण होत असल्याने हारलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहेत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
मागील वर्षी; २०२५मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४४६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात ३९६, अकोला ३८८, बुलढाणा ३४३, वर्धा २२४ तर वाशीम जिल्ह्यात २१२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये युवा शेतकरी, भाड्याने शेती करणारे शेतकरी यांच्या नावाने सात-बारा नाही म्हणून सरकार दरबारी या आत्महत्यांची नोंद नाही. मक्त्याने शेती करणाऱ्या शेतमजुरांची संख्या प्रत्येक खेड्यात ५० टक्के आहे. त्यांना सरकारी पीककर्ज तसेच सरकारची नुकसानभरपाई मिळत नाही. नापिकी झाली तरी शेतीचे भाडे देणे अटळ असल्याने सात-बारा नावावर नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे. सरकारने पतपुरवठा, बियाणे सुधार, पीक पद्धतीत बदल तसेच लागवड खर्च ५० टक्क्यांनी कमी करणे, हमीभावावर राज्याने बोनस देणे या उपाययोजना न केल्यास चालू वर्षात हे संकट अधिक गहिरे होणार असल्याची भीतीही तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
Pune Crime : तळेगावात आईवरून शिवी दिल्याचा राग, तरुणाचं नको ते धक्कादायक कृत्य, पुणे हादरलं
आत्महत्याग्रस्तांमध्ये यांचा समावेश…
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये घाटंजी तालुक्यातील ससाणी येथील विलास जुनघरे, घोटीचे प्रकाश कुसराम; केळापूर तालुक्यातील सुसरीचे धीरज सामृतवार, बुजरूकच शाहू राठोड खैगाव; झरी जामणी तालुक्यातील झिबलाचे सचिन मरस्कोल्हे, गणेशपूरचे श्रीधर वारस्कर, भेंडाळाचे मारोती तुरणकर; बाभूळगाव तालुक्यातील मालापूरचे गजानन हेमने, मुस्ताबादचे गोपाळ घोंगे, डेहणीचे किसन वासनिक; यवतमाळ तालुक्यातील झुलीचे महेंद्र लडके, लोणीचे सुनील चव्हाण; दिग्रस तालुक्यातील रुई तलाव येथील संदीप राठोड, माळ हिवराचे प्रकाश भुजाडे, रूई मोठीचे महादेव ढगे; आर्णी तालुक्यातील परसोडाचे प्रशांत गुढे, महागाव तालुक्यातील शिरपूरचे नितीन देशमुख, दारव्हा तालुक्यातील मांगकिन्हीचे महादेव लावरे, उमरखेड तालुक्यातील भाम्बखेडातील शरद देशमुख, नेर तालुक्यातील पिंपरी कलगाचे नितीन फुलझले, कळंब तालुक्यातील कोठाचे वैभव शिरभाते, कळंब तालुक्यातील कोठाचे वैभव शिरभाते, राळेगाव तालुक्यातील जागजईचे प्रवीण वागदे यांचा समावेश आहे. या २२ शेतकऱ्यांव्यतिरिक्त दहा भाड्याने शेती करणाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र नावावर सात-बारा नसल्याने सरकार दरबारी त्यांनी नोंद होऊ शकली नसल्याचेही तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कारणे काय ?
बँकांमार्फत केवळ ५० टक्के पीककर्ज वाटप.
सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत लूट.
लागवड खर्च दुप्पट होऊनही अपेक्षित उत्पन्न नाही.
संकटकाळात सरकारकडून तुटपुंज्या मदतीचे वाटप.

