Yavatmal Two People Drown: आत्राम हे पत्नी शांता यांच्यासोबत श्रावण पवार यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होते. सकाळी ८.३०च्या सुमारास दोघे शेतात गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर पत्नी शांता घरी परतली, मात्र संभाजी हे शेतातच थांबले.

रविवारी दुपारपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने वाघाडी नदीच्या कोपरी-येरंडगाव रस्त्यावरील चिंचोली गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते. यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गावकऱ्यांना दिसून आला. संजय तुरक पाटील यांच्यासह स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नदीला आलेल्या पुराचा प्रवाह इतका जोरदार होता की मृतदेह पुढे तरोडा गावाच्या दिशेने वाहून गेला. संध्याकाळपर्यंत या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती.
रिक्षाच्या धडकेत 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; आईसमोर तडफडत सोडला जीव, नाशिक हळहळलं
शिरोली येथे संभाजी भुऱ्या आत्राम (६०) या मजुराचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्राम हे पत्नी शांता यांच्यासोबत श्रावण पवार यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होते. सकाळी ८.३०च्या सुमारास दोघे शेतात गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर पत्नी शांता घरी परतली, मात्र संभाजी हे शेतातच थांबले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाइकांनी शोध सुरू केला. मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे ते नाला ओलांडताना वाहून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. रविवारी दुपारी माणिक विठ्ठल आत्राम यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात झाडाला अडकलेल्या अवस्थेत संभाजी यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Pune Crime: घोर कलियुग! पुण्यात जन्मदात्यांकडूनच काळजाच्या तुकड्याचा सौदा, ४० दिवसांच्या बाळाला…. धक्कादायक घटना
चंद्रपूर जिल्ह्यात ‘ऑरेंट अलर्ट’ जारी
चंद्रपूर : हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंट अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mumbai Crime: काकाने १६ वर्षीय पुतण्याला निर्घृणपणे संपवलं, कोल्ड्रिंकमधून दिलं विष, कारण ऐकून हादराल!
दहा महिन्यांची बालिका बचावली
मंडी जिल्ह्यातील तलवाडा गावात झालेल्या ढगफुटीत अवघ्या दहा महिन्यांची नीतिका ही बालिका आश्चर्यकारकरीत्या बचावली आहे. तिच्या घरातील अन्य तीन सदस्य पुरात वाहून गेले अथवा मरण पावले आहेत. नीतिकाचे वडील रमेशकुमार (३१) घराबाहेर पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक आलेल्या लोंढ्यामुळे वाहून गेले. रमेश यांना शोधण्यासाठी बाहेर पडलेली नीतिकाची आई राधादेवी (२४) आणि आजी पूर्णूदेवी (५९) या बेपत्ता आहेत. नीतिकाचे शेजारी प्रेम सिंह यांनी तिला घरात एकटीच रडत असताना पाहिलेे. बलवंत हे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे खासगी सुरक्षारक्षक आहेत.

