Headlines

Vande Bharat Express Train Speeding on Waterlogged Railway Tracks Viral on Social Media Confusion if Real or Fake; वेगवान वंदे भारतमुळे उड्डाणपुलावर फवारे, व्हिडिओ खरा की AI? ‘परे’-‘मरे’च्या परस्पर विरोधी दाव्यांनी संभ्रम


Vande Bharat Social Media Video : कांजुरमार्ग ते विक्रोळीदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखालील रुळांवर साचलेल्या पाण्यातून भगव्या रंगाची ‘वंदे भारत’ वेगाने जात असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला

Vande Bharat Express Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली असतानाच वंदे भारत वेगाने रुळांवरील पाणी कापत जात असल्याची चित्रफीत समाज माध्यमावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही चित्रफीत कृत्रिम प्रज्ञेवर (एआय) आधारित असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले असतानाच पश्चिम रेल्वेने मात्र इन्स्टाग्रामच्या आपल्या अधिकृत खात्यावर ही चित्रफित दाखवत त्यास ‘वंदे भारत रॉक्स…’, अशी ओळ दिली आहे. रेल्वेच्या दोन्ही विभागांच्या या परस्परविरोधी दाव्यांमुळे चित्रफितीच्या सत्यतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

कांजुरमार्ग ते विक्रोळीदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखालील रुळांवर साचलेल्या पाण्यातून भगव्या रंगाची ‘वंदे भारत’ वेगाने जात असल्याची चित्रफित समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. ‘वंदे भारत’चा वेग एवढा की, त्यामुळे साचलेल्या पाण्याचा फवारा थेट उड्डाणपुलावरील दुचाकी, चारचाकींवर उडाल्याचे चित्रफितीत दिसत आहे.
Maharashtra TimesPune News : धावपट्टीवर विमानाने वेग पकडला, ATC ची अचानक सूचना अन् अत्यंत तातडीचे ब्रेक, पुणे विमानतळावर गंभीर प्रकार, कारण गुंगवणारं

मध्य रेल्वे म्हणते एआय व्हिडिओ

या चित्रफितीबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) डॉ. स्वप्नील निला यांच्याकडे विचारणा केली असता ‘वंदे भारतच्या चित्रफितीतील उंची आणि पोहोच यांचा मेळ बसत नाही. पाणी दोन्ही बाजूंनी वाहताना दिसायला हवे. मात्र, ते एकाच दिशेने वाहताना दिसत आहे. तसेच उंचीही वास्तवाशी जुळत नाही, त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हे तयार केल्याचे वाटते’, असे त्यांनी सांगितले.

VIDEO | राम मंदिरात चोरी,फडणवीसांचा ठाकरेंना टोला

पश्चिम रेल्वेने इन्स्टावर व्हिडिओ टाकला

मध्य रेल्वेच्या स्पष्टीकरणातून चित्रफितीवर पडदा पडत असतानाच पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्यासह विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून ही चित्रफीत दाखवत त्याखाली ओळ देण्यात आली आहे.परंतु ही चित्रफित खरी की खोटी, याबाबत वक्तव्य करणे त्यांनी टाळले. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

किनारा मार्गाच्या बोगद्याला गळती

मुंबईतील प्रवास वेगवान होण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने मार्च २०२४ पासून टप्प्याटप्याने सुरू केलेल्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या बोगद्यात पावसामुळे गळती होत असल्याचे दिसून आले. हजारो कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या या मार्गाच्या बोगद्यातील सांध्यांमधून गळती होऊ लागली आहे. ही गळती निदर्शनास येताच मुंबई महापालिकेकडून रविवारी तातडीने मलमपट्टी सुरू करण्यात आली.
Maharashtra TimesBandra East Deck : गरीबनगरची झोपडपट्टी हटवली, आता वांद्रे पूर्वेला 300 स्क्वेअर मीटरचा आधुनिक डेक, 700 प्रवाशांची क्षमता, गर्दीवर भन्नाट तोडगा

पॉलिमर ग्राऊंटिंग इंजेक्शनचा वापर

सेवेत आल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनीच या मार्गातील बोगद्याची दुर्दशा उघडकीस आली होती व बोगद्याच्या एका ठिकाणी गळती लागून पाणी झिरपू लागले होते. तेव्हाही डागडुजी करून ही गळती थांबवण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा बोगद्यातील सांध्यांमधून गेल्या दोन-तीन दिवसांपासून गळती सुरू झाली. महापालिकेला ही बाब निदर्शनास येताच त्यांनी कंत्राटदाराच्या मदतीने गळती थांबवण्यासाठी रविवारी तातडीने काम हाती घेतले. सांध्यातील गळती थांबवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पॉलिमर ग्राऊंटिंग इंजेक्शनचा वापर करण्यात आला. सर्व सांध्यांमधून होणारी गळती या इंजेक्शनमुळे थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते, असे सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा