रायगड जिल्ह्यातील अवचितगडावर इतिहासाचा अमूल्य ठेवा सापडला आहे. सह्याद्रीच्या कुशीत दडलेला गेल्या अनेक वर्षांचा इतिहास या निमित्ताने उजेडात आला आहे. तब्बल 60 फूट खोल दरीत स्वराज्याच्या तोफांचा शोध लागला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ऐतिहासिक अवचितगड अर्थात श्रीमंतगडावर इतिहासाचा आणखी एक अमूल्य ठेवा सापडला आहे. सह्याद्रीच्या कुशीत, तब्बल 600 ते 700 फूट खोल दरीत दडलेल्या दोन शिवकालीन तोफांचा शोध लागला आहे. त्या सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. शिवशंभू प्रतिष्ठान आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडलेल्या या थरारक मोहिमेमुळे अवचितगडावरील ऐतिहासिक तोफांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
गेली पंधरा वर्षे अवचितगडाचे संवर्धन, स्वच्छता आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवशंभू प्रतिष्ठानने यापूर्वीही गड परिसरातील तीन ऐतिहासिक तोफांचा शोध लावून त्यांचे जतन केले होते. त्या तोफांना संवर्धनानंतर तोफगाडे जोडून सन्मानाने गडावर स्थापित करण्यात आले होते. त्याचवेळी परिसरात आणखी काही तोफा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सातत्याने शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली.
दोन तोफांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम
२१ जून रोजी शिवशंभू प्रतिष्ठान आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक यांच्या पथकाने अवघड भौगोलिक परिस्थितीत विशेष मोहीम राबवली. दाट जंगल, निसरडे उतार आणि खोल दरी अशा आव्हानांवर मात करत सदस्यांनी दोरखंड आणि विशेष साधनांच्या मदतीने या दोन तोफांना बाहेर काढले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या तोफा पुन्हा गडावर आणण्यात यश आले.
तोफांना पुन्हा मूळ स्थानावर आणलं
गडावर तोफा पोहोचताच ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भंडारा उधळून आणि जल्लोषात या ऐतिहासिक तोफांचे स्वागत करण्यात आले. स्वराज्याच्या वैभवाच्या या साक्षीदारांना पुन्हा त्यांच्या मूळ स्थानावर आणण्याचा मान मिळाल्याने दुर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. MLC Election : सांगली-साताऱ्यात महायुतीचे तब्बल 100 मतं फुटली, नेमका निकाल काय?
अवचितगडाचा महादरवाजा आजही भक्कम
अवचितगड हा स्वराज्यकालीन इतिहासाचा महत्त्वाचा वारसा मानला जातो. गडावरील सात टाक्यांचा समूह, दुर्मिळ द्वादशी तलाव, उत्तर व दक्षिण बुरुज आणि आजही दिमाखात उभा असलेला महादरवाजा हे या गडाचे विशेष आकर्षण आहे. अनेक किल्ल्यांचे महादरवाजे युद्ध काळात नष्ट झाले असताना अवचितगडाचा महादरवाजा आजही भक्कमपणे उभा आहे.
अवचितगडाच्या वैभवात भर
या ऐतिहासिक शोधामुळे अवचितगडाच्या वैभवात आणखी भर पडली आहे. स्वराज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय पुन्हा उजेडात आला आहे. हरवलेल्या तोफांचा शोध पूर्ण झाल्याने दुर्गसंवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिवशंभू प्रतिष्ठानच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा जतन करण्यासाठी भविष्यातही असेच प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा