अकोल्यातील मूर्तिजापूर येथे मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. ओव्हरटेक करताना दुचाकीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेने लग्नाचा आनंद शोकात बदलला आहे.
लग्नाच्या आनंदावर काळाची झडप; पत्रिका वाटून परतताना जावयाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, मूर्तिजापूर (अकोला) : मुलाच्या लग्नाचा आनंद असतानाच एका भीषण अपघाताने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नाची पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या नवरदेव मुलाचे वडील आणि मामाचा दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मामा गंभीर जखमी आहे. ही दुर्दैवी घटना मूर्तिजापूर तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात राज्य महामार्गावर घडली. शरद उत्तमराव डोंगरे आणि रमेश रामदेव जामनिक हे दोघे नातेवाईक (जावई- साला) मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. वाई गावावरून टिपटाळा या आपल्या गावाकडे दुचाकीने (क्रमांक MH 30 AS 4403) परतत असताना, शिवाजीनगर 6 जवळ त्यांनी समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.
एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार शरद उत्तमराव डोंगरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचे सोबत असलेले रमेश रामदेव जामनिक हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी रमेश जामनिक यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परिसरात हळहळ
दरम्यान, ज्या घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण होते, तिथे या अपघाताच्या बातमीने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मूर्तिजापूर तालुका आणि टिपटाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे किती जीवावर बेतू शकते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा