Thalapathy Vijay : सीजेपी आंदोलनादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी मागणी केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी केंद्र सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. थलपती विजय यांनी म्हटलं आहे की, नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करावी. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनावरही मुख्यमंत्री थलपती विजय यांनी प्रतिक्रिया दिली.
थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘नीट (NEET) परीक्षा लागू झाल्यापासून, केवळ त्या परीक्षेची विश्वासार्हता कमी झाली नाही, तर विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.’
Rahul Gandhi ना उचलणं ही BJP ची चूक? Dharmendra Pradhan पहिल्यांदाच बोलले, Thalapathy Vijay ची Entry
नीट (NEET) पूर्णपणे रद्द करावी – टीव्हीके (TVK)
टीव्हीके (TVK) नं म्हटलं आहे की, नीट (NEET) परीक्षेमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना होणारं नुकसान कधीही न संपणारं आहे. त्यामुळे, आम्ही केंद्र सरकारकडे नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करतो.
राहुल गांधींच्या अटकेबद्दल मुख्यमंत्री विजय काय म्हणाले?
पंतप्रधानांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत असताना राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं टीव्हीकेनं म्हटलं आहे. टीव्हीकेने पुढे लिहिलं की, ‘दिल्लीतील युवा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी फरफटत नेऊन हातकड्या घालणं, हा लोकशाहीच्या हक्कांवर झालेला एक हल्ला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे.’ Aamir Khan Brother Hyder Ali Khan : आमिर खानचा सावत्र भाऊ; राहायला घर नाही, खायला अन्न नाही, मित्र पाजतात गावठी दारू; एक्स पत्नीचा खुलासा
काय घडलं नेमकं?
नीट पेपरफुटीचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईवरून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केलं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे नंतर या आंदोलनात सामील झाल्या. विरोधी पक्षनेत्यांना घटनास्थळावरून जबरदस्तीनं हटवण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा