Sunita Ahuja On Govinda : गोविंदा आणि त्याची कथित गर्लफ्रेंड कोमल राणी एअरपोर्टवर पुन्हा एकत्र दिसले. यावर आता अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजानं प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता, गोविंदा, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी, सुनीता अहुजा अभिनेत्याचं अफेअर असल्याचा आरोप करत आहे. ते अनेक वर्षांपासून वेगळे राहत असल्याचा दावाही तिनं केला होता आणि त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा झाल्या. गोविंदावर विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप आहे. त्याचं नाव कोमल नावाच्या एका महिलेसोबत जोडलं गेलंय. अशातच आता सुनीता अहुजानं पुन्हा एकदा अभिनेत्यावर आपला राग व्यक्त केला आहे.
‘रूपा’ चित्रपटाच्या घोषणेपासून गोविंदा अभिनेत्री कोमल राणीसोबत काम करत असल्यामुळे चर्चेत आहे. त्या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदा आणि कोमल विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यावर सुनीतानं आपला राग व्यक्त केला होता. आता, गोविंदा आणि कोमल पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. यावर सुनीतानं प्रतिक्रिया दिली आहे.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
गोविंदाबद्दल काय म्हणाली सुनीता?
सुनीता म्हणाली की, ‘आधी सिनेमा बनवायला लागतो, चित्रपट बनल्यानंतर प्रमोशन होतं. काय बोलायचं…लेकीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरतोय. त्याला थोडी लाज वाटायला पाहिजे. त्यानं काहीतरी मर्यादा पाळायला पाहिजेत.’ पुढे, कोमलला उद्देशून सुनीता म्हणाली की, ‘तुझा ‘शुगर डॅडी’ इतका श्रीमंत आहे, तू किमान चांगले कपडे तरी घालायला हवेत. आमच्याकडे बघ, आम्ही किती स्टाईलमध्ये फिरतो. हे खूप वाईट आहे, त्याचं डोकं फिरलं आहे.’ कोमल आणि गोविंदा गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, अशा चर्चा आहेत. मात्र, गोविंदानं या नात्याला दुजोरा दिलेला नाही. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदा सुनीताबद्दल बोलताना म्हणालेला की, ‘ती मला अतिशय प्रेमानं शिव्या देते आणि मीसुद्धा ते आनंदाने स्वीकारतो. मला वाटतं की, देवाने ज्या व्यक्तीला जिथं ठेवलं आहे आणि जी जबाबदारी दिली आहे, ती त्यांनी निभावली नसती तर आज आपण जे काही यशस्वी झालो आहोत तिथे पोहोचलोच नसतो. आमच्या कुटुंबातील प्रत्येक मुलाला तिनं अत्यंत प्रेमानं सांभाळले आहे. स्वतःच्याच माणसांबद्दल वाईट बोलून यश मिळवणं सोपं असतं. सुनीता हे काम खूप हुशारीनं करतं. ती चार शब्द कौतुकाचे बोलते आणि शेवटी एक टीका करून जाते. पण मला त्यातही तिचं प्रेमच दिसतं.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा