मुंबई – इम्रान हाश्मीचा ‘अवारापन २’ आणि सनी देओलचा ‘पार्टिशन १९४७’ शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे थक्क करणारे आहेत, कारण इम्रान हाश्मीच्या सिनेमानं केवळ प्री-सेल्समध्येच ‘अवारापन’ चित्रपटाची लाईफटाईम कमाई मागे टाकली आहे. इतकंच नाही, तर ‘अवारापन २’ ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्यानं ‘बटवारा १९४७’ पेक्षा २००% अधिक कमाई केली आहे.
इम्रान हाश्मी आणि सनी देओलच्या सिनेमाची कमाई
१९ वर्षांनंतर इम्रान हाश्मी आणि सनी देओल यांचे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. २००७ मध्ये ‘अवारापन’ आणि ‘अपने’ हे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते. सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला, तर इम्रान हाश्मीचा चित्रपट फ्लॉप झाला.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
सॅकनिल्क रिपोर्टनुसार, इम्रान हाश्मी आणि दिशा पटानीचा ‘अवारापन २’ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंगच्या दिशेनं वाटचाल करत आहे. चित्रपटाच्या ९,१२२ शोंसाठी २.८५ लाखांहून अधिक तिकिटे प्री-बुक झाली आहेत, ज्यामुळे ८.५७ कोटींची दमदार कमाई झाली आहे. दुसरीकडे, सनी देओल आणि प्रीती झिंटाच्या ‘बटवारा १९४७’ ची प्री-सेलमध्ये कामगिरी एवढी खास झालेली नाही. एकूण ८,८८६ शोंसाठी केवळ ६५,३९१ तिकिटे आधी बुक झाली, ज्यातून १.७६ कोटींची कमाई झाली. ब्लॉक सीट्ससह सिनेमाची कमाई ४.२१ कोटी आहे. ‘अवारापन २’ १६९.८३% ने पुढे आहे.
Savita Malpekar : ‘तो सीन करताना माझे पती आयसीयूमध्ये सिरीयस होते’, सविता मालपेकरांनी सांगितला ‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग केवळ ॲडव्हान्स बुकिंगमध्येच नव्हे, तर ऑन-साइट बुकिंग आणि मॉर्निंग शोजमध्येही ‘बटवारा १९४७’ खूप मागे आहे. इम्रान हाश्मीच्या ‘अवारापन २’ च्या सकाळी ९ वाजताच्या १,८१० शोजपैकी २१.०% शोजमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती होती, तर सनी देओलच्या चित्रपटाच्या १,७१७ शोजपैकी केवळ ८.०% शोजमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती होती. ॲडव्हान्स बुकिंगची आकडेवारी, सकाळच्या शोमधील प्रेक्षकांची उपस्थिती आणि ऑन-साइट बुकिंगच्या ट्रेंडनुसार, ‘आवारापन २’ आता पहिल्या दिवशी १५ कोटी ते २० कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहेत.
Manisha Koirala : ‘एकटेपणा जाणवायचा, आता मी मरणार आहे असं वाटायचं’, मनीषा कोईरालानं सांगितला कॅन्सरचा कठीण काळ दरम्यान, २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’बद्दल बोलायचं झाल्यास, १९ वर्षांपूर्वी मूळ चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ७.७६ कोटी रुपयांचं लाईफटाईम नेट कलेक्शन जगभरात अंदाजे १३ कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती. ‘अवारापन २’ आणि ‘बटवारा १९४७’ या दोन्ही चित्रपटांसाठी हा वीकेंड खूप महत्त्वाचा आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाल्यामुळे, शनिवार, १५ ऑगस्टचा सिनेमाला फायदा होईल.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा