गणेशोत्सवास एक महिना राहिलेला असताना पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी महत्त्वाची सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. येत्या गणेशोत्सवाआधी या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) तयार केलेल्या गणेशमूर्ती व अन्य उत्सव मूर्तींना विरोध आणि समर्थन दर्शवणाऱ्या याचिकांवर गेल्या महिन्याभरापासून नियमित एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल राखून ठेवला. मात्र, त्याचवेळी हा निकाल येईपर्यंत न्यायालयाच्या परवानगीविना ‘पीओपी’निर्मित मूर्तींचे कोणत्याही नैसर्गिक जलप्रवाहांत विसर्जन करता येणार नसल्याचा ९ जून २०२५ रोजीचा अंतरिम आदेश लागू राहील, असेही न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) १२ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे पीओपी मूर्तींची निर्मिती, विक्री व विसर्जनावर बंदी होती. मात्र, राज्य सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारस अहवालानंतर सीपीसीबीने आपल्या भूमिकेत बदल केला आणि ती मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक नसून मार्गदर्शक सूचनांच्या स्वरूपात असल्याचे प्रतिज्ञापत्रावर स्पष्ट केले. ते लक्षात घेऊन, न्यायालयाने ९ जून २०२५ रोजीच्या आदेशाने पीओपी मूर्तींच्या निर्मिती व विक्रीला परवानगी दिली; मात्र अशा मूर्तींचे विसर्जन न्यायालयाच्या परवानगीविना नैसर्गिक जलप्रवाहांत करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.
नंतर सरकारचे विसर्जन धोरण लक्षात घेऊन, २४ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाने केवळ सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहांत करण्यास परवानगी दिली. मात्र, ही परवानगी केवळ ३१ मार्च २०२६ पर्यंतच असेल, असेही न्यायालयाने त्या आदेशात स्पष्ट केले होते. आता खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आधी येणे अपेक्षित आहे. अन्यथा ९ जून २०२५ रोजीच्या अंतरिम आदेशाप्रमाणे सर्व पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनावर बंदी असेल.
सीपीसीबीची बदललेली भूमिका आणि सहा फुटांवरील मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहांत करण्याविषयीचे राज्य सरकारचे धोरण याला पर्यावरणप्रेमी रोहित जोशी व अन्य काहींनी सुधारित जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. तर अखिल भारतीय उत्सव समिती तसेच मूर्तिकारांच्या वेगवेगळ्या संघटनांनी ‘पीओपी’चे समर्थन करणाऱ्या याचिका केल्या आहेत. त्याविषयीच्या सुनावणीअंती खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.
जनहित याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद काय?
‘राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे सीपीसीबीने तज्ज्ञांच्या मदतीने पीओपी हानिकारक असल्याबाबतचा अभ्यास करून तसा निष्कर्ष मांडला होता. त्यामुळे अभ्यासच झाला नसल्याचा मूर्तिकारांचा युक्तिवाद चुकीचा आहे. इतकेच नव्हे, तर राज्य सरकारने गेल्या वर्षी नेमलेल्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या तज्ज्ञ समितीनेही तशाच स्वरूपाचा अहवाल दिला. शिवाय, सीपीसीबीने मूर्तींची निर्मिती व विक्रीवर बंदी नसल्याची भूमिका मांडतानाच विसर्जनावर बंदी असल्याचेही स्वत:च म्हटले होते. गेल्या वर्षी सरकारच्या धोरणाने केवळ सहा फुटांवरील पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनाला हंगामी परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात लहान मूर्तींचेही विसर्जन झाले. त्यामुळे त्या धोरणालाही काही अर्थ उरत नाही’, अशा स्वरूपाचा अखेरचा युक्तिवाद जनहित याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. रोनिता भट्टाचार्य यांनी मांडला.
‘महाराष्ट्राने प्रतिगामी भूमिका घेणे श्रेयस्कर नाही’
‘आधी सीपीसीबीनेच सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पीओपीवर पूर्ण बंदी आणली होती. त्याआधारेच मुंबई उच्च न्यायालयासह अन्य राज्यांतील उच्च न्यायालयाने आणि राष्ट्रीय हरित लवादाने बंदीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. त्यामुळे संपूर्ण देशभरात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण झाले. मात्र, राज्य सरकारच्या विनंतीनंतर सीपीसीबीने मूळ भूमिकाच बदलली. प्रत्यक्षात अधिकृतरीत्या नवी मार्गदर्शक तत्त्वे आणली नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्राने पीओपी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहांत करण्याचा आग्रह धरून प्रतिगामी भूमिका घेणे श्रेयस्कर नाही’, असा युक्तिवाद ॲड. भट्टाचार्य यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा