Kudal Apla Bazaar Mall FDA Raids : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धुमाकूळ घातला आहे. त्याचदरम्यान, कुडाळमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते झालेल्या मॉलवर देखील छापा टाकण्यात आलेला आहे.

प्रशासनाचा थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ परिसरात या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 17 जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते अत्यंत दिमाखात आणि मोठ्या थाटामाटात शुभारंभ झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या भव्य मॉलवर शुक्रवारी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या पथकाने धाड टाकत चौकशी सुरू करत थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे.
Uddhav Thackeray Speech: ओमराजेंचं बंड उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी; निवडणुकीच्या सभेतील तो प्रसंग सांगत सगळंच काढलं!
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाचं पथक काल शुक्रवारी अचानक मॉलमध्ये धडकले. अधिकाऱ्यांनी आत पाऊल टाकताच सर्वात आधी मॉलमध्ये खरेदी करत असलेल्या ग्राहकांना तात्काळ बाहेर काढलं. त्यानंतर मॉलचे मुख्य दरवाजे बंद करून आतमध्ये चौकशीचा धडाका सुरू करण्यात आला. सध्या पथकाकडून मॉलच्या व्यवस्थापनासह संपूर्ण स्टाफची कसून चौकशी केली जात आहे. अन्नपदार्थांचे परवाने, साठा आणि कायदेशीर कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. अवघ्या 48 तासांपूर्वी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रिबन कापून सुरू झालेल्या मॉलवर अशी कोणतं मोठं संकट आलं की, थेट अन्न व भेसळ अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागली? हा विषय सध्या सध्या कुडाळमध्ये चांगलाच चर्चेचा झाला आहे. उद्घाटनाची चर्चा ओसरते ना ओसरते, तोच मॉलवर सरकारी पथकाची धाड पडल्याची बातमी कुडाळ शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि मॉलच्या बाहेर नागरिकांची गर्दी झाली.
उघड्यावरील चायनीज सेंटर बिर्याणी सेंटर यांच्याकडे दुर्लक्ष
दरम्यान, सध्या कोकणात काही दुकानावर धाडी घालण्यात येत असल्या तरीही चक्क उघड्यावर चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटर सुरू असलेल्या ठिकाणी विक्रेत्यांवर मात्र प्रशासनाचे अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीयेत. या उघड्यावरील चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटरकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालं आहे. या चायनीज सेंटरमधून टोमॅटो सॉससारखे पदार्थही विकले जातात. या सेंटरवरील अन्नपदार्थांची, मसाल्यांची आणि सॉसचीही प्रयोगशाळेत तपासणी होणे आवश्यक आहे.
Pune ST Bus: पुणे विभागात एसटीचे उत्पन्न वाढले! बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कारवाई; १५ दिवसांत ५ कोटी रुपयांची वाढ
इतकंच नाही तर कोकणातील अनेक चायनीज सेंटरच्या बाहेर 100 फुटांवर उभे राहिल्यास अनेकजणांचे डोळे चुरचुरतात हा अनुभवही अनेकांनी घेतला आहे, त्यामुळे या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचीही तपासणी होणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्हाभरात काही चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटर चक्क रस्त्याच्या कडेला उघड्यावरच सुरू असतात. इतकंच नाही तर आरोग्यविषयीचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी चक्क उघड्यावर सुरू असलेल्या चायनीज सेंटर व बिर्याणी सेंटरचीही तपासणी करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.

