Headlines

Ramraksha Vs Hanuman Chalisa: रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा; विदर्भात 18 जुलैला ठाकरे-राणा आमनेसामने – ramraksha vs hanuman chalisa uddhav thackeray and navnit rana to face off in vidarbha on 18 july


Ramraksha Vs Hanuman Chalisa: ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नवनीत राणा हनुमान चालीसानं उत्तर देणार. अमरावतीत राणाचं हनुमान चालीसा आंदोलन. १८ जुलैला मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आणि संघभूमीत ठाकरे सेनेचं आंदोलन होणार आहे.

navnit rana
नवनीत राणा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अयोध्येतील कथित दान अपहारावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून, पक्षाने राज्यभरात रामरक्षा आंदोलन छेडले आहे. मुंबईनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट नागपुरात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून माजी खासदार नवनीत राणा उद्या, १८ जुलैला अमरावती शहराजवळील प्रसिद्ध हनुमान गढी येथे हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ असलेल्या रामनगरच्या श्रीराम मंदिरात शनिवारी उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत. मात्र, या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. हनुमान गढीच्या नरेशाचा हा चमत्कार आहे, म्हणूनच ठाकरेंना रामरक्षा पठण करण्याची सद्बुद्धी सुचली, असा टोला त्यांनी लगावला.

Maharashtra TimesFarmers Death: सहा महिन्यांत 415 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; अमरावती विभागात संकट गहिरे, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक घटना
नवनीत राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधताना जुन्या संघर्षाची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘श्री हनुमान चालीसा पठणाला विरोध करणाऱ्या उद्धवा, कसा होतास तू आणि कसा झालास तू! अखेर अहंकाराची शिक्षा मिळाली आणि आता श्री रामरक्षा आठवली. सत्ता गेली, पक्ष गेला, आमदार-खासदारही गेले आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचारही सुटले’, असा टोलाही लगावला आहे.

Maharashtra TimesBacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंचा इशारा
जुन्या वादाला फुटले तोंड
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी त्याला तीव्र विरोध केला होता. या वादानंतर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना २३ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. १४ दिवस तुरुंगात घालवावे लागल्याची आठवण करून देत, केवळ हनुमान चालीसा वाचणार म्हणून आमच्यावर राजद्रोह लावणाऱ्यांना आज स्वतः रामरक्षा वाचायला लागत आहे, अशी टीका राणा यांनी केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा