Headlines

Farmers Death: सहा महिन्यांत 415 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; अमरावती विभागात संकट गहिरे, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक घटना – 415 farmers death recorded in amravati division over past six months


Farmer Death Cases: पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्या आहेत. यावर्षी राज्य शासनाने २ जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली. ५ जुलै रोजी पहिली यादी येणार होती.

farmer deaths
शेतकरी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
आरती गंधे, यवतमाळ: सततची नापिकी, वाढता कर्जाचा भार, शेतमालाच्या कोसळलेले दर आणि दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या ंचे दुष्टचक्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मागील सहा महिन्यांत अमरावती विभागात ४१५ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १२८ शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यातील असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

सततच्या नापिकीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकरी थकीत कर्जदार आहेत. कर्ज थकीत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने त्यांना चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन शेती करावी लागते. त्यातच यावर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

Maharashtra TimesLove Story: स्नॅपचॅटवर प्रेम जुळलं; तरुणी प्रियकरासाठी थेट महाराष्ट्रात आली; नंतर नातेवाईकही पोलिसांसह धडकले, पण एका गोष्टीने डाव पलटला!
कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी आपला सात-बारा कोरा होणार या आशेवर होते. यानंतर नवे कर्ज घेऊन खरीप हंगामाची तरतूद करू या विचारात शेतकरी होता. पण, अजूनही कर्जमाफीची यादी आली नाही. बँकांनी हात आखडता घेतल्याने यवतमाळ जिल्ह्यात सरासरी पीककर्ज वाटपाचा टक्का ५०च्या आतच अडकला आहे. अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी हादरला आहे. यातूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना जाहीर केल्या. पण, शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांतील शेतकरी आत्महत्यांचा आकड्यांनी परिस्थितीचे गांभीर्य वाढविले आहे. पूर्वी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा देशभर गाजत होता. त्याची दखल घेतली जात होती. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची दखल सत्तारूढसह विरोधी पक्षाचे नेतेही घेत नसल्याचे चित्र आहे. यातूनच या घटना वाढल्याचाही आरोप होत आहे.
Maharashtra TimesPune News : आमचा ब्रँड अत्यंत मोठा, करायचे ते करा; Expiry उलटलेल्या चीजची विक्री, पुणेकर ग्राहकाने ‘ब्रँड’चा बॅण्ड वाजवला
२७ कुटुंबांनाच मिळाली मदत
आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याने राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मागील सहा महिन्यांत झालेल्या १४४ शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ २७ कुटुंबांना सरकारची मदत मिळाली आहे. अजूनही ११७ शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

बोलके आकडे…
एकूण शेतकरी आत्महत्या : ४१५
पात्र : १४४
अपात्र : ८८
चौकशी सुरू : १८३

अमरावती विभागातील स्थिती
(१ जानेवारी ते ३० जून २०२६दरम्यान)
जिल्हा –शेतकरी आत्महत्या –पात्र –अपात्र –चौकशी सुरू
यवतमाळ —१२८ —४० —३३ —५५
वाशीम —६२ —०८ —१६ —३८
बुलढाणा —६९ —३८ —१४ —१७
अमरावती —७६ —२३ —१४ —३९
अकोला —८० —३५ —११ —३४


किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा