Headlines

Prakash Raj : ‘हुकुमशाहीसारखं वागणारं घाबरट सरकार’, सोनम वांगचुक यांना रुगणालयात दाखल केल्याप्रकरणी प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका


Prakash Raj On Modi Government : प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

Prakash Raj Slams Modi Government
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – शनिवार, १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात घेऊन गेले आणि त्यामुळे सर्वत्र संताप उसळला. दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेनं पोलिसांकडून मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा दावा करत तात्काळ उपोषणाची घोषणा केली. पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात ओढत नेल्याचा दावाही त्यानं केला. दीपकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. आता प्रकाश राज यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत सरकारवर संताप व्यक्त केला आहे. रणवीर शौरी आणि अतुल कुलकर्णी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतर मंतरवरून नेण्यात आलं, तेव्हा कोणालाही काही दिसू नये म्हणून त्यांना पांढऱ्या चादरीनं झाकण्यात आलं होतं. प्रकाश राज यांनीही यावर टोला लगावला. सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकाश राज यांनी लिहिलं की, ‘परदे के पीछे क्या है, छप्पन इंच का डरा हुआ नंगापन’
Maharashtra TimesMedha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया

प्रकाश राज यांचा सरकारवर निशाणा

प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधत लिहिलं की, ‘जग एका घाबरट सरकारला पाहतंय, या सरकारला तरुणांशी संवाद साधायचा नाही, उलट हुकूमशाहीसारखं वागत आहे. सोनम वांगचुक यांना सक्तीनं घेऊन जाणं आणि विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनात अडथळा आणणं हे भीतीचं लक्षण आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे.’

अतुल कुलकर्णी यांनी या विषयावर थेट भाष्य न करता, १९८४ मध्ये सोनम वांगचुक यांचे वडील, सोनम वांग्याल, उपोषणावर असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लेहला धाव घेऊन त्यांचं उपोषण कसं संपवलं होतं, याची आठवण सांगितली. त्यांनी यासंबंधीचे एक पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत लिहिलं, ‘उपोषण सोडण्याचा आणखी एक मार्ग.’

अभिनेता रणवीर शौरीनंही सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात नेण्यावर प्रतिक्रिया दिली. ‘हे सरकार आता स्वतः विरोधी पक्षालाच शस्त्रे पुरवत आहे. किती उदात्तपणा आहे.’

hunger strike मुळे Sonam Wangchuk यांची प्रकृती गंभीर, २० व्या दिवशीही म्हणाले ‘मी मरणार नाही..’

दरम्यान, सोनम वांगचुक कॉकरोच जनता पार्टीच्या सहकार्यानं जंतर मंतरवर आंदोलन करत होते. ते ६ जून रोजी जंतर मंतरवर आले. नीट पेपरफुटी आणि इतर परीक्षांमधील अनियमिततेवरून सोनम वांगचुक यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी २८ जून रोजी उपोषण सुरू केलं आणि त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. २१ दिवसांच्या उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांचं वजन जवळपास १० किलो कमी झालं आहे.