Prajakta Mali Post : प्राजक्ता माळीनं वाढदिवशी महत्वाचा निर्णय घेतला असून त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्तानं अभिनेत्रीनं सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचं दर्शन घेतलं. तसेच अभिनेत्रीनं वाढदिवसानिमित्त आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल प्राजक्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
प्राजक्ता माळीची पोस्ट
प्राजक्ता माळीनं पुण्यातील सारसबागेतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं असून दर्शन घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं की, ‘आज सकाळी सिद्धिविनायक आणि आई तळजाई माता यांचं दर्शन घेतलं आणि या क्षणापासून मी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या मर्जीनं नाही, तर सक्तीनं.’
Dada Kondke : प्रकृती अचानक खालावली, ॲम्ब्युलन्स मिळेना, गाडीनं बॉडी घरी आणली; दादा कोंडकेंच्या निधनाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग ‘माझं शरीर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारत नाहीये, त्यामुळे मला सतत खोकला येत होता. त्यामुळे यापुढे मी कॉफी आणि चहा घेणार नाही, आश्चर्य वाटून घेऊ नका. माझं शरीर सर्व ‘तामसिक’ गोष्टी नाकारत आहे. फक्त काही खोटं बोलणाऱ्या आणि फसवणाऱ्या लोकांना वगळता, मी अधिकृतपणे आतापासून क्रूरतामुक्त झाले आहे.’ असं प्राजक्तनं शेवटी म्हटलं आहे. प्राजक्ता माळीच्या या निर्णयाचं चाहत्यांनी कौतुक केलं असून तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
व्हिगन म्हणजे काय?
व्हिगन जीवनशैलीत कोणत्याही प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जात नाही. दुध, दही, पनीर असे पदार्थ, त्याचसोबतच चामडे, लोकर यांसारख्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर व्हिगन लोक करत नाहीत. बॉलिवूडमधील रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, आमिर खान, अनुष्का शर्मा हे कलाकार व्हिगन झाले आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा