Paresh Rawal on Qquitting Politics; Paresh Rawal: ‘ब्लड प्रेशरच्या तीन गोळ्या’, परेश रावल यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, स्वत:च सांगितलं कारण
Paresh Rawal on Qquitting Politics; Paresh Rawal: ‘ब्लड प्रेशरच्या तीन गोळ्या’, परेश रावल यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, स्वत:च सांगितलं कारण
Paresh Rawal on Quitting Politics:ज्येष्ठ अभिनेते परेश रावल सध्या चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फिल्मी करिअर, वैयक्तिक आयुष्य आणि राजकारणातील सहभाग यावर भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलं आहे. परेश राव हे राजकारणातही सक्रिय होते, पण काही वर्षातच त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय, घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? याबद्दल परेश रावल यांनी खुलासा केला आहे.
२०१४ ते २०१९ या काळात परेश रावल यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता आणि भाजपच्या तिकिटावर गुजरातमधील अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांनी राजकारणापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांनंतर, परेश रावल यांनी राजकारण सोडण्यामागचे खरे आणि धक्कादायक कारण उघड केले आहे.
ब्लड प्रेशरच्या तीन गोळ्या घ्याव्या लागल्या मुलाखती दरम्यान परेश रावल यांनी सांगितलं की, राजकारणातील कामाचा ताण आणि धावपळ त्यांच्या आरोग्यावर बेतली होती. ते म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला, तेव्हापासून माझी खरी धावपळ सुरू झाली. मला आधीपासूनच ब्लड प्रेशरचा (बीपी) त्रास होता, पण राजकारणात गेल्यानंतर मला रोज बीपीच्या तीन गोळ्या घ्याव्या लागू लागल्या. कारण तिथं सतत काम करावं लागतं आणि प्रचंड धावपळ होते. विकी ललवानी यांच्या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.
राजकारण्यांच्या सुखी आयुष्याबद्दल असलेले गैरसमज याबद्दल रावल यांनी भाष्य केलं.आपल्याला सामान्यतः असं वाटतं की, राजकारणी लोक एसी रूममध्ये आरामात बसून असतात, कोणीतरी त्यांचे पाय दाबत असतं आणि ते सुकामेवा खात मजा मारतात.पण जेव्हा मी स्वतः राजकारणात गेलो, तेव्हा समजलं की प्रत्यक्ष काम किती कठीण असतं. तिथं प्रचंड काम करून घेतलं जातं. सततच्या धावपळीमुळं माणूस पूर्णपणे थकून जातो.
हे माझं क्षेत्र नाही… परेश रावल यांनी स्पष्ट केलं की, ते राजकारणात दीर्घकालीन करिअर करण्यासाठी आले नव्हते. त्यांनी केवळ एका मर्यादित कालावधीसाठीच आणि काही उद्दिष्टांसाठी खासदारकी स्वीकारली होती. आपल्या अभिनय कारकिर्दीला सांभाळून राजकारणाला पूर्ण वेळ देणे त्यांना अशक्य वाटू लागलं होतं. ‘शेवटी हे माझं क्षेत्र नाही आणि मला याची पुरेशी समज नाही’ हे ओळखून त्यांनी २०१९ मध्ये स्वतःहून राजकारणाला पूर्णविराम दिला आणि पुन्हा पूर्णवेळ अभिनयाकडे वळले.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा