श्रेयस शैलेश आंबात असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रविवारी सकाळी त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रेयस शनिवारीपर्यंत सुस्थितीत होता, असे आश्रमशाळेतील शिक्षकांनी सांगितले. मात्र रविवारी सकाळी अचानक त्याला धाप लागण्यास सुरुवात झाली. तातडीने मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनच्या साह्याने १०२ रुग्णवाहिकेतून त्याला मनोर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला.
Narali Purnima : नारळी पौर्णिमेपासून समुद्रात गजर; सात बोटी सज्ज, 30 हजार परप्रांतीय कामगारांवर मासेमारी हंगामाची भिस्त‘मासवण परिसरात एका बालकाचा प्रकृती अचानक बिघडून मृत्यू झाल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तापाची लक्षणे असलेल्या सर्व १९ विद्यार्थ्यांना मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर परिस्थितीचे नेमके चित्र स्पष्ट होईल’, अशी माहिती पालघर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश डुंपलवार यांनी दिली. संभाव्य साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्यात आले. डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांच्या तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते; मात्र त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट आजाराचे निदान झाले नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, आश्रमशाळेतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी डहाणूचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती डॉ. डुंपलवार यांनी पत्रकारांना दिली.
Palghar News: शिक्षणासाठी जंगलातून रोज जीवघेणा प्रवास; जव्हारमधील 12 आदिवासी विद्यार्थिनींची व्यथा‘मृत्यूचे कारण तातडीने शोधावे’
एका बालकाचा १५ दिवसांपूर्वी अचानक मृत्यू, त्यानंतर आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थ्याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू आणि आता १९ विद्यार्थ्यांना तापाची लागण या सलग घटनांमुळे मासवण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत कोणत्याही विशिष्ट आजाराचे निदान झाले नसले तरी या घटनांमागील नेमके कारण तातडीने शोधावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी मृत्यू होतायेत. काय उपाययोजना करणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा

