बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात?:अनिल परबांचा सभागृहात सवाल, नाशिकच्या म्हाडा प्रकरणावरून संताप
नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात भूखंडांची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या घरांची राखीव जागांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. नाशिक महापालिका हद्दीत नियमांच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी विकास आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडण्यात आल्याचे…
