चीन म्हणाला- भारताने आमच्या 12 खलाशांना वाचवले:हे उपकार कधीच विसरणार नाही; 1 वर्षापूर्वी केरळजवळ जहाजाला आग लागली होती
भारतातील चीनचे नवीन लष्करी मुत्सद्दी यू जियान यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, भारताने केरळच्या किनाऱ्याजवळ आग लागलेल्या मालवाहू जहाजातून 12 चिनी नागरिकांना वाचवले होते. चीन ही मदत कधीही विसरणार नाही. यू जियान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या स्थापनेच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे सांगितले….
