राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काहीतरी मोठं घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त केल्याची घोषणा केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आज (४ ऑगस्ट २०२६) पासून पक्षाच्या प्रवक्ते पदासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत आहेत”, अशी मोठी घोषणा शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
“यापुढील काळात पुढील आदेश येईपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील. पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी”, असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.
सुनेत्रा पवारांवरील टीकेने राजकारण तापलं
शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्त्यांच्या नियुक्त बरखास्त करण्याची टायमिंगची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एकीकडे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणत खोचक टीका केली आहे. या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
काँग्रेसच्या टीकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलने करत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पुण्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयावर चालून गेले. पण यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.
सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन जी टीका करण्यात आली आणि त्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन देत दुर्गा असल्याचं सिद्ध करुन दाखवा, असं म्हटल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्त संतापले आहेत. राष्ट्रवादीचे विविध नेते आणि कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचा निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेवर आता शरद पवारांच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असं असताना शरद पवारांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्याच बरखास्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसच्या टीकेवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे काय बोलणार?
सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देतात? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर सुनेत्रा पवार यांच्यासमोर उभे राहिलेले पक्षाशी संबंधित प्रश्न आणि इतर घडामोडी याचे संपूर्ण राज्य साक्षीदार आहे. अजित पवार यांच्या निधनाची दुर्दैवी घटना घडून आता सात महिने होत आहेत. यानंतर आता सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधनं हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा