Headlines

Nashik | पोलीस बंदोबस्तावरील काकांना उशीर, पुतण्या आणायला गेला, पण बाईक अपघातात मृत्यू


स्वप्निल गायकवाड हे पोलिस कर्मचारी असून ते नगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी गेले होते. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी आपला पुतण्या मोहन गायकवाड याला दुचाकी वरून जेलरोड येथे घ्यायला बोलावले. त्यानंतर दोघेही दुचाकी वरून घरी जात असताना बिटको चौक या परिसरात एका चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वप्निल आणि मोहन गायकवाड हे दोघे काका-पुतणे गंभीर जखमी झाले.

mohan gaikwad.
नाशिक – शहरामध्ये अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. अशातच शहरातील बिटको चौक या परिसरात दुचाकी व चारचाकी या दोन वाहनांमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मोहन गायकवाड (वय ३६) तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव स्वप्निल गायकवाड असे आहे.

अपघात कसा घडला ?


स्वप्निल गायकवाड हे पोलिस कर्मचारी असून ते नगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी गेले होते. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी आपला पुतण्या मोहन गायकवाड याला दुचाकी वरून जेलरोड येथे घ्यायला बोलावले. त्यानंतर दोघेही दुचाकी वरून घरी जात असताना बिटको चौक या परिसरात एका चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वप्निल आणि मोहन गायकवाड हे दोघे काका-पुतणे गंभीर जखमी झाले.घटना घडल्यानंतर स्थानिकांनी त्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मोहन गायकवाड यांचा मृत्यू झाला. तर पोलीस कर्मचारी स्वप्निल गायकवाड हे गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Maharashtra Timesधरणाच्या आवार भिंतीवर पार्किंग, थोड्याच वेळात कार पाण्यात, भयंकर घटनेने सारेच हादरले

वाहनचालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. धडक दिलेल्या चार चाकी वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्यावरती अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संदर्भातील अधिकचा तपास नाशिक रोड पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.

Maharashtra Timesपत्र, व्हिडिओ अन् दोन लेकींसह विवाहितेने आयुष्य संपवलं, नाशिक हादरलं

पोलिसांनी आपघातांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे

नाशिक रोड येथे रेल्वे स्टेशन असल्यामुळे प्रवासी रात्री नाशिक रोड परिसरातून शहरात विविध ठिकाणी प्रवास करतात. यावेळी रात्री बारा वाजेनंतर देखील नाशिक रोड परिसरात वाहनाचालकांची वर्दळ कायम असते. त्यामुळे अपघातांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी देखील त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असं मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा