Narender Berwal to PM Modi : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांच्या कौतुक सोहळ्यात भारतीय बॉक्सर नरेंदर बेरीवालने केलेली टिप्पणी सर्वांच्या लक्षात राहणारी होती. त्याने नरेंदर नावाची मला चीड आहे, हे पाकिस्तानच्या बॉक्सरने आपल्याला सांगितले होते, ही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली.

बेरिवाल आठवण सांगत होता. ‘तो पाकिस्तानी बॉक्सर मला म्हणाला, तुझे नाव नरेंदर आहे. तुझ्या प्रशिक्षकांचे नावही नरेंदर (राणा) आहे. आणि तुमचे पंतप्रधान नरेंद्र आहेत. मला त्या नावाचा तिटकारा आहे.’ बेरीवालने हे सांगताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना हसू आवरले नाही.
IND vs SL 1st Test : डोमेस्टिकच्या हिटमॅनची भारतीय संघात निवड, साई सुदर्शनच्या जागी संधी, कष्टाचं फळ मिळालंच, पाहा कोण?
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान लवलिना बरगोहाईन हिने भारताच्या नकाशातून ईशान्येकडील राज्य वगळणाऱ्या रेस्टॉरंटविरुद्ध तक्रार केली होती. मोदींनी याबाबत तिच्याकडे विचारणा केली. ‘सर, आमची कामगिरी खूप चांगली झाली होती. त्याचा आनंद आम्ही साजरा करत होतो. त्याच वेळी मला त्या रेस्तराँमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दिसला. ते मला अजिबात आवडले नाही. मी त्यांना नम्रपणे सांगितले आणि त्यांनी त्यात सुधारणाही केली,’ असे लवलिनाने पंतप्रधानांना सांगितले.
Zaheer Khan : भारतीय संघात पुन्हा कमबॅक करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेव’; झहीर खानचा मोहम्मद शमीला कानमंत्र, काय म्हणाला?
कारगिल विजय दिनाच्या दिवशी (२६ जुलै) राष्ट्रकुल स्पर्धेत पाकच्या बॉक्सरवरील विजयाचा उल्लेख करणाऱ्या जादुमणी सिंग याचेही मोदींनी कौतुक केले. ‘विजय भारतीय लष्करास समर्पित करून तू गौरवशाली क्षणाची शोभा वाढवलीस.’ मीराबाई चानूला पंतप्रधानांनी लाडू भरवला. ‘पदक मंचावर मी खूप भावुक झाले होते. गेल्या चार वर्षांत मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. हे सर्व आठवत होते. राष्ट्रगीत सुरू झाल्यावर अश्रू रोखणे कठीण झाले,’ अशी आठवण तिने सांगितली.
West Indies Cricket : दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज अडचणीत, 2027 वनडे वर्ल्डकपमधील पात्रतेचा मार्ग कठीण! कारण काय?
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी, तिरंदाजी, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे भारतीय वर्चस्वाचे खेळ नव्हते, त्यानंतरही भारताने पदक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले. हे यश साध्य झाले ते १३ सुवर्णपदकांमुळे. त्यातील आठ अव्वल क्रमांक महिलांनी पटकावली आहेत. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ ब्राँझ अशी एकूण ३९ पदके जिंकली. त्यात महिला खेळाडूंचा वाटा ८ सुवर्ण, चार रौप्य आणि चार ब्राँझ असा आहे. पदक क्रमवारीतील स्थान ठरवण्यात सुवर्णपदके मोलाची ठरतात. त्यावरून महिलांच्या कामगिरीचे महत्व लक्षात येईल.
Zaheer Khan : भारतीय संघात पुन्हा कमबॅक करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेव’; झहीर खानचा मोहम्मद शमीला कानमंत्र, काय म्हणाला?
या सर्व पदक धडाक्यात भारताय बॉक्सरनी सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकून मोलाची कामगिरी केली. त्यांना अॅथलेटिक्समधील; तसेच पॅरा अॅथलेटिक्ससह १६ (तीन सुवर्ण, सात रौप्य आणि सहा ब्राँझ), वेटलिफ्टिंगमधील ८ (एक सुवर्ण, सहा रौप्य आणि एक ब्राँझ) आणि ज्यूदीतील ४ (दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझ) पदकांची महत्त्वाची साथ लाभली. ‘भारतीय महिलांनी जिंकलेली आठ सुवर्णपदके हा अभिमानास्पद क्षण आहे. खेळाडूच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनी अनेक आव्हानाचा सामना केल्यामुळे यश लाभले आहे. सर्वच खेळाडूंनी जिंकलेली पदके ही कष्टाची, त्यांनी यशासाठी दिलेल्या बलिदानाची कहाणी सांगत आहेत.
भारताची उंचावणारी कामगिरी
- भारत आता राष्ट्रकुलातील एकूण पदकांमध्ये चौथ्या क्रमांकावर.
- भारताची एकूण ५६४ पदके. त्यात २०३ सुवर्ण, १९० रौप्य आणि १७१ ब्राँझ पदके
- २०२२च्या बर्मिंगहॅम स्पर्धेत भारताची २२ सुवर्ण, १६ रौप्य; तसेच २३ ब्राँझसह ६१ पदके. त्या वेळीही चौथे स्थान
- २०१८च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० ब्राँड़ासह एकूण ६६ पदके.
- भारताची सर्वाधिक पदके २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान असताना. त्या वेळी ३८ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ ब्राँझ यासह एकूण १०१ पदके.
- पदक क्रमवारीतही सर्वोत्तम दुसरे स्थान

