Nanded Ardhapur farmer Gunaji Pawar End Life : घटनेची माहिती मिळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. सपकाळ हे 23 जून मंगळवारी रोजी आसूड मोर्चासाठी नांदेडला आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबाची चर्चा करून सांत्वन केलं. आर्थिक मदत देखील केली. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

मुलींच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलं
शेतकऱ्याने उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे आई-वडिलांनी घरातील कर्ताधर्ता मुलगा गमवावा लागला, तर पत्नीचा आधारवड हिरावून गेला आणि चार मुलींच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरवलं. वडिलांच्या घेतलेल्या टोकाच्या पाऊलामुळे चारही मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनं अख्खं घर उघड्यावर आलं असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
Sunday Mega Block : प्रवाशांसाठी मोठी बातमी! रविवारी तब्बल 5 तास ट्रान्स-हार्बर मार्ग बंद राहणार, मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक
गुणाजी पवार हे अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील रहिवासी आहेत. गुणाजी हेच घरातील कर्ताधर्ता असून शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते, शिवाय खासगी संस्थेतील फायनान्समधून पैसे उचलले होते. पाच लाखाहून अधिक कर्ज असल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलं. चार मुलींच्या शिक्षणाचा वाढता खर्च, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि पीककर्जाचा ताण याच मानसिक तणावातून गुणाजी पवार यांनी 15 जून सोमवारी रोजी विष प्राशन केलं आणि 18 जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या निधनाने अख्खं कुटुंब उघड्यावर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही बँकेनं कर्जाच्या परतफेडसाठी नोटीस पाठवली आहे.
मुलींचं शिक्षण अंधारात, अर्धांगवायू आलेल्या बापाच्या डोळ्यात अश्रू
गुणाजी पवार हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना केवळ दोन एकर शेती आहे. तर घरात आई-वडील, एक भाऊ, पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. चारपैकी एक मुलगी अकरावीत आहे तर अन्य तीनजण शिक्षण घेत आहेत. यातील एक मुलगी मुकबधीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, गुणाजी यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यानं पलंगावर आहेत. घराची जवाबदारी गुणाजी यांच्यावर होती.
Siya Goyal : केतनने खूप जीव लावला, आदर दिला, मुलासारखाच होता; सिया गोयलच्या पालकांनी पहिल्यांदाच सोडले मौन, लेकीच्या कृत्यावर म्हणाले…
आसमानी आणि सुलतानी संकटासोबत कर्जबाजारीचा सामना त्यांना करावा लागत होता. या संकटातून वडिलांनी टोकाचं पाऊल उचलल्यानं चारही मुलींचं शिक्षण अंधारात सापडलं आहे. दुसरीकडे कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हरवल्यानं कुटुंबियांचे डोळे पाणावले आहेत. शिवाय एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

