Headlines

Nagpur Pollution: मुंबई अन् पुण्यापेक्षा नागपूर अधिक प्रदूषित; उन्हाळ्यात 46 दिवस धूलिकण मर्यादेपेक्षा अधिक – nagpur more polluted than mumbai and pune dust particle levels exceeded limits on 46 days during summer


Nagpur Pollution: रस्त्यावरील धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि औष्णिक वीज प्रकल्प हे धूलिकणांचे प्रमुख स्रोत असल्याचे सीआरईएच्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-12T091718
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: वायू प्रदूषण केवळ हिवाळ्यातच वाढते, हा समज यंदाच्या उन्हाळ्यातील आकडेवारीने खोटा ठरविला आहे. मार्च ते मे या उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत संत्रानगरीची हवा मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत अधिक प्रदूषित असल्याचे सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लीन एअरने (सीआरईए) केलेल्या विश्लेषणातून समोर आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीआधारे हे विश्लेषण करण्यात आले. मार्च ते मे या ९२ दिवसांच्या कालावधीत नागपूरमध्ये ४६ दिवस पीएम-१० म्हणजे धूलिकणांची पातळी वार्षिक सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त नोंदली गेली. ही सुरक्षित मर्यादा ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आहे. याच कालावधीत मुंबई आणि पुण्यात सुरक्षित मर्यादा ओलांडणारे दिवस केवळ पाच ते सहा होते. त्यामुळे उन्हाळ्यातील वायूप्रदूषणाच्या बाबतीत नागपूरची स्थिती अधिक चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra TimesSharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? भाजपमधील मित्रांकडून मला माहिती; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोटमे महिन्यात नागपूर हे राज्यातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले, तर एप्रिलमध्ये शहराचा क्रमांक पाचवा होता. मेमध्ये नागपूरमधील धुलीकणांची सरासरी पातळी सुमारे १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदली गेली. याबाबत मे महिना हा शहरातील गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक दुसरा प्रदूषित महिना ठरला. जीपीओ, सिव्हिल लाइन्स आणि महाल येथील निरीक्षण केंद्रांवर उन्हाळ्यातील तिन्ही महिन्यांत धूलिकणांची पातळी सातत्याने सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक होती.

पावसाचा अभाव असल्याने रस्त्यावरील धूळ वाहनांच्या हालचालींमुळे पुन्हा हवेत मिसळते. तसेच नागपूर हे अंतर्गत शहर असल्याने हवेची देवाणघेवाण तुलनेने कमी होते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. सीआरईएचे विश्लेषक डॉ. मनोज कुमार यांनी उन्हाळ्यातील प्रदूषणाकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली.

Maharashtra TimesCrime News: तरुणाला सोडून महिलेनं दुसरा संसार थाटला, पण पहिला पती भलताच भडकला; नव्या जीवनसाथीवर भररस्त्यात हल्ला!प्रमुख कारणे
-रस्त्यावरील धूळ
-औद्योगिक उत्सर्जन
-औष्णिक वीज प्रकल्प
-पावसाचा अभाव
-अंतर्गत शहर असल्याने हवेची देवाणघेवाण कमी

उन्हाळ्यातील धूलिकणांची स्थिती
शहर सुरक्षित— मर्यादा ओलांडलेले दिवस
नागपूर— ४६
मुंबई— ५ ते ६
पुणे— ५ ते ६

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा